निगा फहीम देशमुख / शेगावविदर्भाचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज संस्थानची दरवर्षी पंढरपुरच्या विठोबाच्या भेटीसाठी श्रींची पालखी आषाढी वारीकरिता १ महिण्याचा पायी प्रवास करुन आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यात पोहचते. या पालखीचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थानचा गजराज हा पालखी सोबत राहतो. या गजलक्ष्मीच्या पायाला कुठलीही इजा होवू नये यासाठी संस्थानने गजलक्ष्मीच्या पायासाठी विशेष पादत्राणे तयार केली आहे.ही पादत्राणे घालूनच गजराज दररोज सकाळी ११ वाजता आणि सांयकाळी ७ वाजता श्रीं च्या आरतीसाठी नित्यनियमाने पोहचतो. उल्लेखनीय म्हणजे संस्थानने मंदिराच्या आवारात भंक्ताची पादत्राणे ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी या गजलक्ष्मीची पादत्राणे काढून ठेवण्यात येतात हे विशेष. प्रगटदिन उत्सवाच्या वेळेस संस्थानचे राजकुमारी नामक हत्तीणचा मृत्यु झाल्याने गजलक्षूमी एकटी आहे. त्यामुळे या वेळेसच्या पालखी सोबत हा गजराज गेलेला नाही. सध्या शेगाव येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यावेळी गजलक्ष्मीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
‘गजलक्ष्मी’ला पादत्राणे
By admin | Updated: June 22, 2014 01:15 IST