शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

२६ लाख लाेकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

बुलडाणा : खाद्यपदार्थांमधील भेसळसह इतर महत्त्वाची कामे असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गत काही वर्षांपासून शासनाचे ...

बुलडाणा : खाद्यपदार्थांमधील भेसळसह इतर महत्त्वाची कामे असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गत काही वर्षांपासून शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील २६ लाख लाेकांची अन्नसुरक्षा धाेक्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मेडिकल , हाॅटेल यांची तपासणी करण्याचे महत्वाचे काम असते. या विभागात गत काही वर्षांपासून महत्त्वाची पदे रिक्त आहेत. बुलडाणा कार्यालयात २०११ मध्ये अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची ११ पदे मंजूर हाेती. कालांतराने ही पदे तीनवर मर्यादित करण्यात आली आहे. दुसरीकडे हाॅटेल आणि मेडिकलची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात १० हजार ८०६ नाेंदणीकृत हाॅटेल आहेत. तसेच इतर १ हजार ५२६ हाॅटेल आहेत. तसेच १ हजार ८५६ मेडिकल आहेत. यापैकी ५टक्के मेडिकलची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात देण्यात येते. बुलडाणा येथील कायार्यालयात केवळ एकच अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे, १३ तालुक्यांतील मेडिकलचे तपासणी कशी करणार? असा प्रश्न पडलेला आहे. बुलडाणा कार्यालयात शिपायांची चार पदे मंजूर आहेत. चारही रिक्त आहेत. नमुना सहायकांची दाेन पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करण्यावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.

२५,८६,२५८

जिल्ह्याची लाेकसंख्या

३६ मेडिकलवर कारवाई एकाचा परवाना केला रद्द

एप्रिल ते आतापयर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ५५५ मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३६ मध्ये अनिमितता आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकामध्ये गंभीर स्थिती असल्याने परवाना रद्द करण्यात आला आहे.

मेडिकलची हाेते तपासणी

जिल्ह्यातील १८५६ मेडिकल आहेत. त्यापैकी ५ टक्के मेडिकलची तपासणी करण्याचे उद्दिष्टे देण्यात येते. कर्मचारी कमी असल्यामुळे प्रत्येक मेडिकलची तपासणी शक्य नसल्याने काही गावांमध्ये भेटी देऊन तपासणी करण्यात येते.

नियमित तपासणीसाठी कर्मचारीच नाही

n जिल्ह्यात हाॅटेलांची संख्या पाहता नियमित तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे, तक्रारी आलेल्या आणि काही गावांची निवड करून तपासणी करण्यात येते. सर्वच हाॅटेलाची तपासणी करणे कर्मचारी नसल्याने शक्य नसल्याचे चित्र आहे.