शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पिकांवर आर्द्रतायुक्त धुक्याचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:22 IST

या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आर्द्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढल्याने पश्चिम विदर्भातील ४ लाख २७ हजार हेक्टरवरील तूर पीक संकटात सापडले आहे. या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे.पश्चिम वºहाडातील शेतकरी यंदा परतीच्या पावसाने हैराण झाले. खरीप हंगामाच्या शेवटी आलेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. ते नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्याच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अतिपावसामुळे ज्या शेतात पाणी साचले त्या शेतातील तूर पिकाची उभे झाडी वाळून गेली. चिभडीच्या शेतातील तूर नष्ट झाली; मात्र ज्या शेतातील पाण्याचा वापसा लवकर झाला त्याठिकाणचे तूर पिकाची परिस्थिती चांगली आहे. मात्र त्या तुरीवरही आता आर्द्रतायुक्त धुक्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. अमरावती विभागामध्ये तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ११ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १०४ टक्के तूर लागवड करण्यात आलेली आहे. ४ लाख २७ हजार ८०४ हेक्टर क्षेत्रावर तूर असून आद्रतायुक्त धुक्याचा परिणाम या पिकावर आता जाणवायला लागला आहे. पश्चिम वºहाडातील तूर पिक सध्या फुलांनी बहरलेली आहे. तर काही ठिकाणची तूर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू सध्या निर्माण झालेल्या धुक्यामुळे फुलांना गळती लागली आहे. या धुक्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने तुरीच्या शेंगा काळ्या पडण्याचा धोका अधिक आहे.

धुक्याचे प्रमाण वाढल्याने फुलात असलेल्या पिकांवरील फुले गळती होण्याचा धोका आहे. शेंगा लागलेल्या ठिकाणी हिरवी अळी पडू शकते. शेतकºयांची योग्य ती काळजी घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी.- डॉ.सी.पी.जायभाये,कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती