शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चारा टंचाईचे सावट; उपाययोजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:54 IST

पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर नुकसानाच्या आढावा बैठकीमध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी चारा उत्पादकांना चारा लागवडीचे बियाणे वितरित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू अद्याप कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सर्व चारा उत्पादक पिकांचे नुकसान झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मका, ज्वारी व सोयाबीन पिकांपासून मिळणारा चारा मिळणार नसल्यामुळे याबाबत आतापासून नियोजन करून उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना चारा उत्पादक पिकांचे बियाणे वितरित करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी लागल्यास तो सुद्धा देण्यात यावा. शेतकºयांनी शेतातच चारा पिकांचे ‘प्लॉट’ घेवून चारा घ्यावा, असे आवाहनही तत्कालीन पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले होते. डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी आढावा बैठक घेऊन चारा टंचाईवरही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय घडामोडीत नुकसानाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पावसाने चाºयाचे नुकसान झालेले असतानाही अद्याप कुठेच चारा टंचाईवर उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. भविष्यात चाºयाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासून योग्य त्या उपाययोजना केल्यास चाराटंचाईवर मात करता येऊ शकते. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बोरकर यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.पावसाने सडले कुटारजिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पासून मिळणाºया कुटारावरच गुरांचे पोषण होते. परतीच्या पावसापूर्वी ज्या शेतकºयांनी सोयाबीन काढली होती, त्यांचे कुटार शेतातच साठवून ठेवलेले होते. परंतू पावसाने अनेकांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार भिजले. अति पावसाने काही ठिकाणी तर कुटार पुर्णता सडले आहे. त्यामुळे यंदा पशुपालकांकडे कुटार उपलब्ध नाही.

मक्याचा चाराही झाला नष्टया खरीप हंगामामध्ये २४ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. परंतू मका पीक पावसाने पुर्णता नष्ट झाले आहे. मका कणसावर कोंब आले. काही ठिकाणचे मका पीक गुरांना खाण्यासारखे सुद्धा राहिले नाही. त्यामुळे यंदा मका पिकाचा चाराही जिल्ह्यातील गुरांना मिळणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती