शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चारा टंचाईचे सावट; उपाययोजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:54 IST

पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर नुकसानाच्या आढावा बैठकीमध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी चारा उत्पादकांना चारा लागवडीचे बियाणे वितरित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू अद्याप कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सर्व चारा उत्पादक पिकांचे नुकसान झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मका, ज्वारी व सोयाबीन पिकांपासून मिळणारा चारा मिळणार नसल्यामुळे याबाबत आतापासून नियोजन करून उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना चारा उत्पादक पिकांचे बियाणे वितरित करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी लागल्यास तो सुद्धा देण्यात यावा. शेतकºयांनी शेतातच चारा पिकांचे ‘प्लॉट’ घेवून चारा घ्यावा, असे आवाहनही तत्कालीन पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले होते. डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी आढावा बैठक घेऊन चारा टंचाईवरही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय घडामोडीत नुकसानाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पावसाने चाºयाचे नुकसान झालेले असतानाही अद्याप कुठेच चारा टंचाईवर उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. भविष्यात चाºयाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासून योग्य त्या उपाययोजना केल्यास चाराटंचाईवर मात करता येऊ शकते. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बोरकर यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.पावसाने सडले कुटारजिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पासून मिळणाºया कुटारावरच गुरांचे पोषण होते. परतीच्या पावसापूर्वी ज्या शेतकºयांनी सोयाबीन काढली होती, त्यांचे कुटार शेतातच साठवून ठेवलेले होते. परंतू पावसाने अनेकांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार भिजले. अति पावसाने काही ठिकाणी तर कुटार पुर्णता सडले आहे. त्यामुळे यंदा पशुपालकांकडे कुटार उपलब्ध नाही.

मक्याचा चाराही झाला नष्टया खरीप हंगामामध्ये २४ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. परंतू मका पीक पावसाने पुर्णता नष्ट झाले आहे. मका कणसावर कोंब आले. काही ठिकाणचे मका पीक गुरांना खाण्यासारखे सुद्धा राहिले नाही. त्यामुळे यंदा मका पिकाचा चाराही जिल्ह्यातील गुरांना मिळणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती