शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पावसामुळे चाराटंचईचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:19 IST

परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे.

- ब्रम्हानंद जाधव

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परतीच्या पावसाने चारा पिकांचेही अतोनात नुकसान केले आहे. शेतात साठवून ठेवलेले कुटार भिजले असून, धऱ्यावरील उभे गवतही सडले आहे. त्यामुळे गुरांची भूक भागवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन सध्या सुरू आहे.परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात आधीच चारा पिकांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यात आता पावसाने चाºयाचे नुकसान केल्याने चारा टंचाईचे संकट जिल्ह्यावर निर्माण झाले आहे. काही शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे कुटार शेतात साठवून ठेवलेले होते. ते सुद्धा या पावसाने भिजले आहे. काही कुटाराच्या ढिगांना बुरशी चढली आहे. शेताच्या बांधावर असलेले गवतही काळवंडले आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे, परंतू त्यातुलनेत उपलब्ध चारा दरवर्षी कमी असतो. यावर्षी उपलब्ध चाºयाचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे गवत सडल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. सर्वत्र पीक नुकसानाचा सर्वे सुरू असताना पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुकास्तरावरून उपलब्ध चारा व किती चाºयाचे नुकसान झाले याची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून पशुसंवर्धन विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे उपलब्ध होणारपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांपासून मिळणारा चारा आता उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांना चारा उत्पादक बियाणे वितरीत करण्याचे संकेत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी रविवारी जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेताना दिले. पावसामुळे ज्या ठिकाणी चाºयाचे नुकसान झाले आहे, त्याचा प्रथमिक सर्वे सुरू आहे. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी चाºयाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रत्येक तालुकास्तरावरून उपलब्ध चाºयाचा आढावा घेण्यात येत आहे.- डॉ. पी. जी. बोरकर,जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी