शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:29 IST

जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 

ठळक मुद्देतिघांची निर्दाेष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. शहरातील सतीफैलमधील अभिनव संजय तायडे (वय २२) या युवकास ४ जानेवारी २0१६ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास राहुल उज्जैनवाल, कालू आठवले, सुरज सारवान, विजय सारवान यांनी भुसावळ चौकात थांबवून मारहाण केली होती. जगदंबा देवी उत्सवादरम्यान मंडपाच्या किरकोळ बाबीवरून हा वाद उफाळला होता. मारहाण करीत असताना अभिनव तायडे हा जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तेव्हा विजय सारवान याने धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. याशिवाय सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल यानेसुद्धा अभिनवला मारहाण केली. त्यामुळे आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानासमोर तो जखमी अवस्थेत खाली पडला. आकाश पिवाल, धर्मा सुसगोहर, राम पिवाल, कालू आठवले यांनी हातपाय धरून पकडून ठेवले. सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल, विजय सारवान यांनी अभिनवच्या पोटावर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेची तक्रार अभिनवचा मामा देवीदास धुरंधर यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन सुरज सारवान (वय १९) रा. सतीफैल, विजय राजू सारवान (वय २१) रा. रेखा प्लॉट, आकाश जीवन पिवाल (वय २३), राम जीवन पिवाल (वय २५), धर्मा शांतीलाल सुसगोहर (वय २६), काल आठवले (वय २३), राहुल उज्जैनवाल (वय २१) सर्व रा. सतीफैल, राजू सारवान (वय ५0) रा. रेखा प्लॉट या आठ जणांविरुद्ध कलम ३0२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १0९, १२0 (ब), १३५ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार डी.डी.ढाकणे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक