शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:29 IST

जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 

ठळक मुद्देतिघांची निर्दाेष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. शहरातील सतीफैलमधील अभिनव संजय तायडे (वय २२) या युवकास ४ जानेवारी २0१६ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास राहुल उज्जैनवाल, कालू आठवले, सुरज सारवान, विजय सारवान यांनी भुसावळ चौकात थांबवून मारहाण केली होती. जगदंबा देवी उत्सवादरम्यान मंडपाच्या किरकोळ बाबीवरून हा वाद उफाळला होता. मारहाण करीत असताना अभिनव तायडे हा जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तेव्हा विजय सारवान याने धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. याशिवाय सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल यानेसुद्धा अभिनवला मारहाण केली. त्यामुळे आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानासमोर तो जखमी अवस्थेत खाली पडला. आकाश पिवाल, धर्मा सुसगोहर, राम पिवाल, कालू आठवले यांनी हातपाय धरून पकडून ठेवले. सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल, विजय सारवान यांनी अभिनवच्या पोटावर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेची तक्रार अभिनवचा मामा देवीदास धुरंधर यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन सुरज सारवान (वय १९) रा. सतीफैल, विजय राजू सारवान (वय २१) रा. रेखा प्लॉट, आकाश जीवन पिवाल (वय २३), राम जीवन पिवाल (वय २५), धर्मा शांतीलाल सुसगोहर (वय २६), काल आठवले (वय २३), राहुल उज्जैनवाल (वय २१) सर्व रा. सतीफैल, राजू सारवान (वय ५0) रा. रेखा प्लॉट या आठ जणांविरुद्ध कलम ३0२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १0९, १२0 (ब), १३५ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार डी.डी.ढाकणे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक