शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:29 IST

जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 

ठळक मुद्देतिघांची निर्दाेष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. शहरातील सतीफैलमधील अभिनव संजय तायडे (वय २२) या युवकास ४ जानेवारी २0१६ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास राहुल उज्जैनवाल, कालू आठवले, सुरज सारवान, विजय सारवान यांनी भुसावळ चौकात थांबवून मारहाण केली होती. जगदंबा देवी उत्सवादरम्यान मंडपाच्या किरकोळ बाबीवरून हा वाद उफाळला होता. मारहाण करीत असताना अभिनव तायडे हा जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तेव्हा विजय सारवान याने धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. याशिवाय सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल यानेसुद्धा अभिनवला मारहाण केली. त्यामुळे आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानासमोर तो जखमी अवस्थेत खाली पडला. आकाश पिवाल, धर्मा सुसगोहर, राम पिवाल, कालू आठवले यांनी हातपाय धरून पकडून ठेवले. सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल, विजय सारवान यांनी अभिनवच्या पोटावर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेची तक्रार अभिनवचा मामा देवीदास धुरंधर यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन सुरज सारवान (वय १९) रा. सतीफैल, विजय राजू सारवान (वय २१) रा. रेखा प्लॉट, आकाश जीवन पिवाल (वय २३), राम जीवन पिवाल (वय २५), धर्मा शांतीलाल सुसगोहर (वय २६), काल आठवले (वय २३), राहुल उज्जैनवाल (वय २१) सर्व रा. सतीफैल, राजू सारवान (वय ५0) रा. रेखा प्लॉट या आठ जणांविरुद्ध कलम ३0२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १0९, १२0 (ब), १३५ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार डी.डी.ढाकणे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक