शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

१३०० आजारांवर उपचारासाठी ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:38 IST

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नागरिकांना तब्बल १३०० आजारांवर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नागरिकांना तब्बल १३०० आजारांवर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे येत सीएससी सेंटर वअधिकृत रुग्णालयांमध्ये नोंदणी करून सुवर्णपत्र (गोल्डन कार्ड) काढून घेणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्यमान भारत योजनेचा सर्वसामान्यांना लाभ दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यात ७लाख २ हजार २२३ लाभार्थी या योजनेसाठी पात्र असून आतापर्यंत २ लाख ७० हजार ८६१ लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढून घेतले आहे. अजूनही जिल्यात पात्र असतांनाही ४ लाख ३१ हजार ३७२ लाभाथीर्चे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे अगोदरच महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे. सध्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही योजना एकत्रिपणे राबविल्या जात आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत तर आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी काही निकष ठरवून लाभाथी निवडले आहेत. तसेच यादीत आपले नाव आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी आणि अडचणी दुर करण्यासाठी १४५५५ हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आलेला आहे. दरम्यान, योजना सुरू होण्यापूर्वी योजनांची माहिती देणारे पुस्तिका नागरिकांना देण्यात आली होती. हेच कार्ड असल्याचा गैरसमज असल्याने लाभार्थी नागरिक नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे सांगण्यात येत आहे परंतु योजनाचा लाभ घेण्यासाठीदिलेले रुग्णालये व सीएससी सेंटरवरून नोंदणी करून कार्ड काढणे आवशयक आहे. नागरिकांनी सर्व गैरसमज दुर करून स्वत: पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे. नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिकानी गैरसमज बाळगू नये. काही अडचण वाटल्यास जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामान्य रुग्णालयात संपर्क साधावा. १३०० विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. यासाठी नोंदणी करून गोल्डन कार्ड घेण्याची गरज आहे. आमच्याकडून जनजागृती सुरुच आहे. नागरिकांनी पुढे यावे.-डॉ.विवेक सावकेसमन्वयक राज्य आरोग्य सोसायटी, म.जो.फु.आ.यो जिल्हा बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगावayushman bharatआयुष्मान भारत