शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

अखेर १८ गावांतील पथदिवे झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:31 IST

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. ...

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. त्यावर प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग नेते व उंद्री ग्रा.पं. सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनीकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच आंदाेलनाचा इशारा दिला हाेता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत महावितरणने १२ एप्रिल राेजी १८ गावातील बंद पथदिवे सुरू केले आहेत.

या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या, रामनवमी, गुढीपाडवा, रमजान, असे धार्मिक सण आहेत. आधीच कोरोनामुळे सण, उत्सवांवर विरजण पडले आहे. यातच महावितरण कंपनीने वीज देयक थकीत असल्याने उंद्री सर्कलमधील अठरा गावांतील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदींसह महावितरण कंपनी बुलडाणा यांच्याकडे निवेदन दिले हाेते, तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उपअभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव यांना वरिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार उंद्री वैरागडसह १८ गावांतील पथदिवे सुरू केले. यावेळी शिवाजी पाटील, राम नसवाले, आकाश राऊत, पत्रकार वसंत सिरसाठ आदी उपस्थित हाेते.