शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रीया रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:35 IST

आता महाआयटीकडे असलेल्या व्हेंडॉरपैकी निवड करून त्यामार्फत ही प्रक्रीया पूर्ण

- सदानंद सिरसाटखामगाव : राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट-क तसेच अराजपत्रित गट-ब मधील अधिकारी-कर्मचाºयांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडण्यासोबतच महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या भरती प्रक्रीयेत राज्यभरात प्रचंड घोटाळ््याच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर शासनाने भरती प्रक्रीयेत महापोर्टल संस्थेचा सहभाग रद्द केल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने १७ आॅगस्टच्या परिपत्रकात दिला आहे. आता महाआयटीकडे असलेल्या व्हेंडॉरपैकी निवड करून त्यामार्फत ही प्रक्रीया पूर्णकेली जाणार आहे. महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात ७२ हजार पदांची मेगा भरतीची घोषणा केली होती. शासनाच्या सर्वच विभागातील अराजपत्रित गट-ब आणि जिल्हा परिषदांमधील गट-क मधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेचे काम महापरीक्षा पोर्टल या संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने विविध पदांच्या भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी झाल्या. पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. त्यामुळे ३५ जिल्हा परिषदांतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे उमेदवारांना भाग पाडले. त्यामुळे एकाच पदासाठी ३५ जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करण्याची संधी असलेल्या खुल्या प्रवगार्तील उमेदवारांनी १७ हजार तर आरक्षित प्रवगार्साठी १२,५०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले. आॅगस्ट २०१९ मध्ये काही पदांची परीक्षा नियोजित असताना महापोर्टलने उमेदवारांना उडवाउडवीची उत्तरे दिली.  ती परीक्षा अद्यापही झाली नाही. आता शासनाने महापोर्टलद्वारे भरती प्रक्रीयांचे सर्व आदेशच रद्द केले आहेत. आता भरती प्रक्रीया महाआयटीमार्फत तयार केलेल्या व्हेन्डारच्या यादीतून एका ओएमआर व्हेंडॉरची निवड करून प्रक्रीया पूर्ण करण्याचा आदेश परिपत्रकात दिला आहे. 

- परभणीतील दलालांची चांदीमहापरीक्षा पोर्टलमार्फत मेगा भरतीची प्रक्रिया राबविताना घोटाळा करण्याची संधी साधण्यात आली. त्यासाठी तत्कालिन सरकारशी संबंधित परभणी शहरातील काही दलालांनी उमेदवारांशी थेट संपर्क केला होता. दोन लाख रुपये टोकन घेऊन १८ ते २० लाख रुपयांत नियुक्ती केल्याच्या तक्रारीही झाल्या. 

- वनरक्षक, तलाठी भरती प्रक्रीयेत झाला घोळवनरक्षक पदाच्या भरतीमध्ये पुणे, जळगाव जिल्ह्यात गैरप्रकार झाला होता. त्यात दलालांनी केलेल्या प्रतापाच्या तक्रारी झाल्या. याच पदासाठी औरंगाबादमध्ये शारीरिक चाचणी परीक्षेत अनुपस्थित उमेदवारांना नियुक्तीची शिफारस देण्यात आली. १८०० तलाठी पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत उमेदवारांवर अन्याय झाल्याचे प्रकरण उघड झाले. महापरीक्षा पोर्टलची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होईल, अशा तक्रारीही राज्यात सर्वत्र झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची पदभरतीही रखडली होती, परीक्षा शासकीय यंत्रणेकडूनच घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता.

टॅग्स :khamgaonखामगावGovernmentसरकार