शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

अखेर भाेसा गावात चाैकशी समिती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:37 IST

प्रभाव लाेकमतचा भोसा : गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आटल्याने तसेच गावातील वाॅटर फिल्टर शाेभेची वस्तू बनल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती ...

प्रभाव लाेकमतचा

भोसा : गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आटल्याने तसेच गावातील वाॅटर फिल्टर शाेभेची वस्तू बनल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत असल्याचे वृत्त लाेकमतने २४ एप्रिल राेजी प्रसिद्ध केले हाेते़ या वृत्ताची पंचायत समिती प्रशासनाने दखल २६ एप्रिल राेजी गावात चाैकशी समिती पाठवली़ तसेच ग्रामपंचायत प्रशासनानेही तलावातील विहिरीवरून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे़ त्यामुळे, ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

अतिदुर्गम भागात असलेल्या भाेसा गावात ग्रामपंचायतमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी ५ लाख रुपये खर्चून वाॅटर फिल्टर बसवण्यात आले हाेते़ मात्र, या आराे फिल्टरमधून ग्रामस्थांना एक दिवसही पाणी मिळालेले नाही़ तसेच ग्रामपंचायतच्या नियाेजनशून्य कारभारामुळे तलावाचे पाणीही आटले आहे. याविषयी लाेकमतने २४ एप्रिल राेजी वृत्त प्रकाशित केले हाेते़ या वृत्ताची गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी दखल घेत २६ एप्रिल राेजी दाेन विस्तार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली़ या समितीने २६ एप्रिल राेजी भाेसा गावात भेट देउन चाैकशी केली. चाैकशी समितीसमाेर आरओ प्लांट सुरू असल्याचे ग्रामपंचायतच्या वतीने भावण्यात आले़ मात्र, वाॅटर एटीएम बंद असल्याचे तसेच ग्रामस्थांनी आरओ बंद असल्याचे चाैकशी समितीला सांगितले़ गावात पाणीटंचाई नसल्याचे दाखवण्यासाठी ग्रामपंचायतने रात्रीच तलावात खड्डा खाेदून गावात पाणीपुरवठा सुरू केला़ गत काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना त्यामुळे, दिलासा मिळाला आहे़ गावातील पाणीटंचाईची चाैकशी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़

अपहाराची रक्कम वसूलच केली नाही

भोसा ग्रा.पं.च्या सरपंच, सचिवाने या आधी केलेल्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला आहे़ या गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी समिती नेण्यात आली हाेती़ समितीने ३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे तसेच अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचा अहवाल दिला आहे़ मात्र, अजूनही अपहाराची रक्कम वसूल करण्यात आलेली नाही़

दाेन दिवसात अहवाल सादर हाेणार

गावातील आरओ प्लांटची चाैकशी करण्यासाठी आलेल्या समितीचे प्रमुख तथा विस्तार अधिकारी पंचायत सोनुने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरो प्लांट व वाॅटर एटीएम बंद असल्याचे समाेर आल्याचे सांगितले़ ग्रामस्थांनी याविषयी चाैकशी समितीला माहिती दिली आहे़ या चाैकशीचा अहवाल दाेन दिवसातच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़