शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

अखेर भाेसा गावात चाैकशी समिती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:37 IST

प्रभाव लाेकमतचा भोसा : गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आटल्याने तसेच गावातील वाॅटर फिल्टर शाेभेची वस्तू बनल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती ...

प्रभाव लाेकमतचा

भोसा : गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आटल्याने तसेच गावातील वाॅटर फिल्टर शाेभेची वस्तू बनल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत असल्याचे वृत्त लाेकमतने २४ एप्रिल राेजी प्रसिद्ध केले हाेते़ या वृत्ताची पंचायत समिती प्रशासनाने दखल २६ एप्रिल राेजी गावात चाैकशी समिती पाठवली़ तसेच ग्रामपंचायत प्रशासनानेही तलावातील विहिरीवरून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे़ त्यामुळे, ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

अतिदुर्गम भागात असलेल्या भाेसा गावात ग्रामपंचायतमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी ५ लाख रुपये खर्चून वाॅटर फिल्टर बसवण्यात आले हाेते़ मात्र, या आराे फिल्टरमधून ग्रामस्थांना एक दिवसही पाणी मिळालेले नाही़ तसेच ग्रामपंचायतच्या नियाेजनशून्य कारभारामुळे तलावाचे पाणीही आटले आहे. याविषयी लाेकमतने २४ एप्रिल राेजी वृत्त प्रकाशित केले हाेते़ या वृत्ताची गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी दखल घेत २६ एप्रिल राेजी दाेन विस्तार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली़ या समितीने २६ एप्रिल राेजी भाेसा गावात भेट देउन चाैकशी केली. चाैकशी समितीसमाेर आरओ प्लांट सुरू असल्याचे ग्रामपंचायतच्या वतीने भावण्यात आले़ मात्र, वाॅटर एटीएम बंद असल्याचे तसेच ग्रामस्थांनी आरओ बंद असल्याचे चाैकशी समितीला सांगितले़ गावात पाणीटंचाई नसल्याचे दाखवण्यासाठी ग्रामपंचायतने रात्रीच तलावात खड्डा खाेदून गावात पाणीपुरवठा सुरू केला़ गत काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना त्यामुळे, दिलासा मिळाला आहे़ गावातील पाणीटंचाईची चाैकशी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़

अपहाराची रक्कम वसूलच केली नाही

भोसा ग्रा.पं.च्या सरपंच, सचिवाने या आधी केलेल्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला आहे़ या गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी समिती नेण्यात आली हाेती़ समितीने ३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे तसेच अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचा अहवाल दिला आहे़ मात्र, अजूनही अपहाराची रक्कम वसूल करण्यात आलेली नाही़

दाेन दिवसात अहवाल सादर हाेणार

गावातील आरओ प्लांटची चाैकशी करण्यासाठी आलेल्या समितीचे प्रमुख तथा विस्तार अधिकारी पंचायत सोनुने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरो प्लांट व वाॅटर एटीएम बंद असल्याचे समाेर आल्याचे सांगितले़ ग्रामस्थांनी याविषयी चाैकशी समितीला माहिती दिली आहे़ या चाैकशीचा अहवाल दाेन दिवसातच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़