शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, श्रमिक व सैनिकांसाठी लढा

By admin | Updated: April 4, 2016 02:01 IST

त्रिवेणी संग्राम संमेलनात राज्यभरातील श्रमिकांचा संकल्प.

बुलडाणा : शेतक-यांची मुले सैनिक आणि श्रमिक आहेत. त्यामुळे या तिन्ही घटकांच्या समस्या वेगळ्या नाहीत. शिवाय आर्थिकदृष्ट्या या तिन्ही घटकांची परिस्थितीही सारखी आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी, सैनिक आणि श्रमिकांच्या प्रश्नासाठी संयुक्तरीत्या लढा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.नवृत्त कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने शेतकरी, श्रमिक, सैनिक यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शहरात ३ एप्रिल रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथे त्रिवेणी संग्राम महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी, श्रमिक व सैनिक यांच्या ज्वलंत समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे तर अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून ओआरओपीचे नेता जनरल सतबीर सिंग, माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते विजय जावंधिया, वामनराव चटप, समन्वय समितीचे महामंत्री प्रकाश पाठक, श्रमिक नेता देवराव पाटील, भीमराव डोंगरे, पुंडलीकराव पांडे उपस्थित होते.प्रास्ताविकात कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले, की शेतकरी, सैनिक व श्रमिक ही त्रिवेणी शक्ती या संग्राम महासंमेलनाच्या व्यासपीठावरून आता एकत्र आली असून, एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते काम करणार आहेत. यावेळी राज्याचे माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते वामनराव चटप यांनीही शेतकर्‍यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी श्रमिकांच्या समस्या मांडून, यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. या त्रिवेणी संग्राम महासंमेलनासाठी राज्यभरातून जवळपास ७ हजार शेतकरी, सैनिक व श्रमिक उपस्थित होते.