शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेतकरी, श्रमिक व सैनिकांसाठी लढा

By admin | Updated: April 4, 2016 02:01 IST

त्रिवेणी संग्राम संमेलनात राज्यभरातील श्रमिकांचा संकल्प.

बुलडाणा : शेतक-यांची मुले सैनिक आणि श्रमिक आहेत. त्यामुळे या तिन्ही घटकांच्या समस्या वेगळ्या नाहीत. शिवाय आर्थिकदृष्ट्या या तिन्ही घटकांची परिस्थितीही सारखी आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी, सैनिक आणि श्रमिकांच्या प्रश्नासाठी संयुक्तरीत्या लढा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.नवृत्त कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने शेतकरी, श्रमिक, सैनिक यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शहरात ३ एप्रिल रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथे त्रिवेणी संग्राम महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी, श्रमिक व सैनिक यांच्या ज्वलंत समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे तर अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून ओआरओपीचे नेता जनरल सतबीर सिंग, माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते विजय जावंधिया, वामनराव चटप, समन्वय समितीचे महामंत्री प्रकाश पाठक, श्रमिक नेता देवराव पाटील, भीमराव डोंगरे, पुंडलीकराव पांडे उपस्थित होते.प्रास्ताविकात कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले, की शेतकरी, सैनिक व श्रमिक ही त्रिवेणी शक्ती या संग्राम महासंमेलनाच्या व्यासपीठावरून आता एकत्र आली असून, एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते काम करणार आहेत. यावेळी राज्याचे माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते वामनराव चटप यांनीही शेतकर्‍यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी श्रमिकांच्या समस्या मांडून, यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. या त्रिवेणी संग्राम महासंमेलनासाठी राज्यभरातून जवळपास ७ हजार शेतकरी, सैनिक व श्रमिक उपस्थित होते.