शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जानेफळ परिसरात सर्दी, खोकल्यासह तापेचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार ...

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार जण आजारी पडलेले दिसत आहेत. ज्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, सध्या शेतातील काम धंद्याचे दिवस असताना ते सोडून दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. अशातच खासगी दवाखान्यातील इंजेक्शन व सलाइनचे दर सुद्धा वाढविण्यात आले असल्याने याचा फटका जनतेला सोसावा लागत आहे. सर्दी व खोकला हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा लगेच फैलाव होत आहे. पावसाळ्यामुळे आलेले नवीन पाणी पचण्यास बाधक ठरत असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांंमधील घाण पाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याने ताप व इतर आजारांचे रुग्ण सापडत आहेत. ओपीडी वाढली दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात या आजाराचे प्रमाण बळावत असते. त्यानुसार यावर्षी अल्प पाऊस आणि त्यातच उन्हाळ्याप्रमाणेच असलेले गरमीचे वातावरण हे आरोग्यास बाधक ठरत असल्याने या आजाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.

रुग्णांनी व जनतेने काळजी घ्यावी : सरपाते

आजारी रुग्णांनी घरगुती उपचार न करतात तज्ज्ञ डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय अशा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा. उपचारात निष्काळजी करू नये. तसेच जनतेने व्हायरल फीवर, जलजन्य आजार, विषाणूजन्य आजार इत्यादीपासून बचावासाठी पाणी उकळून प्यावे. घर, परिसर स्वच्छ ठेवावे आणी डास व मच्छरांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी केले आहे.