शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भीतीदायक अफवा दुप्पट वेगाने पसरतात; मानसोपचार तज्ज्ञाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:21 IST

‘अफवांचा उगम आणि त्यावर नागरिक विश्वास का ठेवतात’ या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांच्याशी चर्चा केली असता भितीदायक अफवा या दुप्पट वेगाने पसरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअफवेची व्याख्याच बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी मांडली. समाज धारणेच्या आधारावर एखादी गोष्ट किंवा माहिती ही खरी समजून नागरिकांकडून तिचा प्रसार केला जातो.प्रामुख्याने चमत्कार आणि भीती यातून अफवांना पेव फुटतात असे डॉ. खर्चे म्हणाले.

- नीलेश जोशी

बुलडाणा : अफवांमुळे धुळे जिल्ह्यात पाच जणांचा जमावाने बळी घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातही अपहरण करून किडणी काढण्याच्या संशयावर मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथे जमावाने तिघांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘अफवांचा उगम आणि त्यावर नागरिक विश्वास का ठेवतात’ या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांच्याशी चर्चा केली असता भितीदायक अफवा या दुप्पट वेगाने पसरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुळात अपुऱ्या माहितीवर काढलेला निष्कर्ष म्हणजेच अफवा होय, अशी साधी सरळ अफवेची व्याख्याच बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी मांडली. बर्याचदा आपला समज अथवा समाज धारणेच्या आधारावर एखादी गोष्ट किंवा माहिती ही खरी समजून नागरिकांकडून तिचा प्रसार केला जातो. त्यातून अशा अफवा उगम पावतात, असे ते म्हणाले. प्रामुख्याने चमत्कार आणि भीती यातून अफवांना पेव फुटतात असे डॉ. खर्चे म्हणाले. चमत्काराच्या अफवेसंदर्भात ‘गणपती दुध पितो’ हे चपखल उदाहरण त्यांनी दिले तर भीतीदायक अफवा म्हणजेच धुळ््यीतील मुले पळविणारी टोळी आल्याची आणि बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री गवळी येथील अपहरण करून किडणी काढणारी टोळी आल्याची अफवा होय,असे ते म्हणाले. समाजामध्ये काही बाबतीत आपण आपली विशिष्ट बाबींची प्रतिमा गृहीत धरून कृती करत असतो. धुळे जिल्ह्यातील घटना आणि बुलडाणा जिल्हयातील अपहरण करून किडणी काढण्याची अफवा त्या संदर्भात पूर्व माहिती काढण्याआधीच त्या संदर्भात मनात निर्माण केलेली प्रतिमा संबंधीत बाबींची शहानिशा न करताच आपल्याकडील इनपूट टाकून नागरिक जेव्हा ती पुढे पाठवतात तेव्हा त्यातून अफवा जोर पकडते. आपल्या लगतच्या वर्तुळातील लोकांसाठी आपण विश्वसनीय असतो. त्यामुळे सोबतचे लोक लगेच त्यावर विश्वास ठेवतात आणि ही अफवा दुप्पट वेगाने पसरते. त्यात भीतीदायक अफवेचा वेग अधिक असतो. भीतीपोटी व्यक्ती आक्रमक होतो आणि मग अन्य लोकही त्याच्या कृतीचे अनुकरण करतात. जमाव आक्रमक होतो आणि असा जमाव शांत करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे अशा बाबींची विश्वासर्ह्यता तथा सोशल मिडीयावरील संदेशाची विश्वसनीयता तपासणे गरजेचे असते. मात्र अशा परिस्थितीत पूर्वाश्रमीच्या धारणेवरून संबंधीत अफवेची विरुद्ध बाजू गृहीत धरल्या जात नाही. आणि ती पसरते. वानगी दाखल श्रीदेवीचा मृत्यू बाथ टबमध्ये पडून झाला. तो कसा झाला, तीने मद्य प्यायले होते का? इथ पासून ते प्रत्यक्षात त्या खोलीत काय घडले याची प्रतिमाच माध्यमातील बातम्यांवरून प्रेक्षकांनी मनात गृहीत धरून त्यावर तर्कवितर्क लढविल्या गेले. त्यातून तिच्या मृत्यूसंदर्भातही अफवा पसरल्या गेल्या होत्या, असे डॉ. खर्चे म्हणाले. त्यामुळे आपल्याला मिळणार्या माहितीची आधी सत्यता अर्थात विश्वसनियता तपासणे आवश्यक आहे. त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू तपासणे आवश्यक आहे. धुळे, पिंप्रीगवळी प्रकरणात तशा बाबीच तपासल्या गेल्या नाहीत. सोबतच अशा भीतीदायक अफावांमध्ये गुन्हेगाराच्या बाबतीत पोलिसांनी नोंद केली आहे का? पोलिसांनी त्याबाबत काही सुचना दिली आहे का? याचीही तपासणी करणे असे भीतीदायक संदेश प्राप्त झाल्यानंतर ते सोशल मिडीयातून पुढे पाठवतांना आवश्यक आहे. बर्याचदा भितीदायक स्थितीतून मार्ग काढण्याचा किंवा त्या स्थितीतून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा मानवी स्वभाव आहे. त्यातूनच अफवा पसरविण्यास हातभार लागतो, असेही डॉ. खर्चे यांनी अधोरेखीत केले.

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर व्हावा!

सोशल मिडीयाचाही सकारात्मक वापर होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे वाईट नसते. परंतू ते कशा पद्धतीने हाताळल्या जाते यावर त्याचे चांगले वाईट परिणाम अवलंबून असतात. धुळ््यासारख्या घटनेते अफवा सोशलमिडीयावर वेगाने पसरल्याने दुर्देवी घटना घडली. मात्र अशा या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर झाल्यास त्याचे परिणामही चांगले होतात. वानगीदाखल बुलडाणा जिल्ह्यातील विनोद बोरे हे सोशल ‘मिडीयावर पडद्यामागचे नायक’ या सदरामध्ये प्रेरणादायक, सकारात्मक बाबी घेऊन यशस्वी लोकांच्या कथा टाकत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. शैक्षणिक क्षेत्रातही आज सोशलमिडीयाचा सकारात्मक वापर होत आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले.या तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपण अपडेट झालो. पण धुळे, पिंप्री गवळी सारख्या घटना टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सामाजिक अपग्रेडेशनचीही या निमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा