शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
2
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
3
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
4
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
5
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
6
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
7
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
8
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
9
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
11
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
13
३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता
14
इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार
15
शुभांशू शुक्ला अंतराळात घेऊन जाणार होते आमरस अन् शिरा! पण हे पदार्थ खराब नाही होणार का? जाणून घ्या
16
RCB टीम खरेदी करणार का? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मी रॉयल चॅलेंजर पीत नाही..."
17
Trigrahi Yoga 2025: १५ जून रोजी त्रिग्रही योगात पाच राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीची संधी!
18
सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली
19
तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
20
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 

विना टोकन तूर मोजणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण

By admin | Updated: July 10, 2017 00:59 IST

स्वाभिमानीचा जिल्हा उपनिबंधकांना चार दिवसांचा ‘अल्टीमेटम’

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तूर खरेदी काळात विना टोकन तूर मोजमाप होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केले होते; परंतु चिखली सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी याबाबत कारवाई न करता चुकीचा निर्णय दिल्याची तक्र ार स्वाभिमानीचे दीपक सुरडकर यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे देऊन महिना उलटूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी जिल्हाउपनिबंधक यांची भेट घेऊन चुकीचा निर्णय देणारे सहायक निबंधक व संबंधित दोषींवर चार दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.शासनाने तुरीला हमीभाव देऊन नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली होती. काहींनी याचा फायदा घेत आपली तूर जलदगतीने कशी मोजता येईल, यावर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून विना टोकन तूर मोजण्याचा प्रकार चिखली नाफेड केंद्रावर होत असल्याची माहिती मिळताच २०० पोते तूर विना टोकन मोजमाप होत असल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी उघड केला होता. सर्व घटनेचा सहायक निबंधक रूद्राक्ष यांनी पंचनामा केला होता. त्या पोत्यांपैकी मोजमाप झालेली २९ क्विंटल तूर जप्त करण्यात आली होती. तर विना टोकन मोजमाप झालेले पोते कुणाचे, याची कबुली खरेदी-विक्रीच्या व्यवस्थापकांनी इनकॅमेरा दिली होती. मापारी यांच्याकडे जप्त केलेल्या पोत्याची नोंद काळे नावाने आहे. तरीसुद्धा पंचनाम्यातील पंचांना व तक्रारकर्ते दीपक सुरडकर यांना चौकशीदरम्यान विचारात न घेता पोत्यांचा बनावट मालक तयार करून त्या बनावट मालकाच्या शेतात तूर पेरलेली आहे का, याची कुठलीही विचारपूस न करता तलाठ्याने दिलेले पेरेपत्रक खरे की खोटे, याची शहानिशा न करता सातबारा ग्राह्य धरला कसा व बाजार समितीकडे या पोत्यांची नोंद नसल्याचे उघड झाले होते. सहायक निबंधक यांनी मनमानी निर्णय देत उर्वरित पोते बनावट मालकाच्या नावे मोजण्याचे पत्र दिले होते. तर ऐकीकडे तूर खरेदी बंद असताना रात्री उशिरा पोते मोजत असल्याचेही उघड झाले होते. चुकीचा निर्णय देणाऱ्या सहायक निबंधकांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते; परंतु यावर महिनाभराचा कालावधी उलटूनही दोषींवर कारवाई होत नसल्याने मूळ मालक, बनावट मालक व संबंधित दोषी अधिकारी व चुकीचा निर्णय देणारे चिखली सहायक निबंधक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून, चार दिवसांचा अल्टिमेटम निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानीचे संतोष राजपूत, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, विलास तायडे, पंकज पळसकर, अनिल चौहान, भरत जोगदंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.