शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

शेती व्यवसाय झाला तोट्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST

शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीन, कापूस या पिकातही शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. खरीप हंगामात झालेले नुकसान पाहता, शेतकऱ्यांना तूर व रबी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु तूर पिकातही पाहिजे त्याप्रमाणात झडती आलेली नाही. तुरीचे एकरी उत्पादन अडीच ते तीन क्विंटल होत आहे.

तूर या पिकावर शेतकऱ्यांची मदार अवलंबून होती. त्यानंतर समोर पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकावरसुद्धा एक आशा होती. परंतु मोठ्या प्रमाणात अळीच्या प्रादुर्भाव होऊन कपाशी पिकात शेतकऱ्यांना नुकसानच झाले. आतापर्यंत आगोदरच्या विविध पिकात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अनेक संकटाने शेतकरी दिवसेंदिवस शेतीपासून दुरावत जाताना दिसत आहे.

रबीचे उत्पादन वाढविण्याची धडपड

यावर्षी परिसरात रबी हंगामातील गहू व हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीला गहू व हरभरा पीक चांगले बहरले होते. परंतु मध्यंतरी ढगाळ हवामानामुळे या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला. पाण्याची व्यवस्था असलेला शेतकरी यावर्षी रबी हंगामातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.