शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभावासाठी शेतकरी घालणार संसदेला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 17:32 IST

 बुलडाणा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्याघऊन देशभराती शेतकरी हे २९ आणि ३० नोव्हेंबरला ...

 बुलडाणा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्याघऊन देशभराती शेतकरी हे २९ आणि ३० नोव्हेंबरला दिल्लीत संसदेला घेराव घालणार आहेत. देशातील २०४ शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत. दरम्यान, देशातील काही महत्त्वपूर्ण नेतेही या आंदोलनात सहभागी होणार आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी संसदेमध्ये मांडलेल्या ‘शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक २०१८’ आणि ‘शेतीमालाला दीडपट हमीभाव’ या दोन विधेयकांवर तसेच शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समितीच्यावतीने हे घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील या २०४ संघटना आता एकत्र आल्या असून शेतकर्यांच्या प्रश्नासाठी देशपातळीवर त्यातून अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला. खा. राजू शेट्टी आणि समितीच्या नेत्यांनी संपूर्ण देशभर पाहणी करून विविध राज्यातील शेतकर्यांच्या समस्या, त्यांचा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्यांचे सत्र या मागील कारणे व त्यावरील उपाययोजना याचा अभ्यास करून उपरोक्त दोन विधेयके लोकसभेत मांडली आहेत. या दोन्ही विधेयकांवर आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी समितीने केली आहे. दरम्यान, त्यादृष्टीने अपेक्षीत हालचाल न झाल्याने समितीने हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनामध्ये देशातील जवळपास २५ हून अधिक पक्ष सहभागी होणार असून विविध राज्यातील मुख्यमंत्री, माजी पंतप्रधानांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, चंद्राबाबु नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला, मायावती, अखिलेश यादव, शरद यादव यांनाही या आंदोलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून या आंदोलनात शेतकर्यांना सहभागी होता यावे म्हणून दिल्ली येथे जाण्यासाठी कोल्हापूर येतून स्वतंत्र रेल्वे आरक्षीत करण्यात आली असून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात ही स्वाभीमानी एक्सप्रेस २८ नोव्हेंबरला दिल्लीसाठी रवाना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातीलही शेतकरी या आंदोलनासाठी रवाना होणार असून शेतकर्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना