शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

शेतकर्‍यांचे पांढरे सोने शेतातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:45 IST

बुलडाणा: सोयाबीन निघाल्यानंतर कपाशीची बोंडे फुटल्यामुळे हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस बाजारात विकून बँकेचे काही कर्ज फेडावे, असा विचार शेतकर्‍यांचा आहे; मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रुपये किलो असताना यावर्षी ४ रुपयाने दरवाढ करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे पांढरे सोने शेतातच पडून आहे.

ठळक मुद्देमजूर मिळणे कठीण वेचणीसाठी किलोमागे ४ रुपयांची दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन निघाल्यानंतर कपाशीची बोंडे फुटल्यामुळे हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस बाजारात विकून बँकेचे काही कर्ज फेडावे, असा विचार शेतकर्‍यांचा आहे; मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रुपये किलो असताना यावर्षी ४ रुपयाने दरवाढ करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे पांढरे सोने शेतातच पडून आहे.बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगाम शेतकर्‍यांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. घाटाखालील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात कापूस काळवंडला, या शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी  पडून सरकीला कोंबे फुटली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर आल्याने वेचण्याची तयारी होऊ लागली असताना शेतकर्‍यांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.  साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यावर्षी याला थोडा विलंब होईल असे वाटत होते; पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पर्‍हाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे; मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजूरच मिळत नसल्याने शेतकर्‍यांची चांगलीच गोची झाली आहे. काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकर्‍यांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसून आले आहे.  

मजुरांना शेतात ने-आण करण्याचाही खर्चमागील वर्षीपेक्षा यावर्षी शेतमजुरांच्या मजुरीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंचेत असताना यात आणखी भर म्हणजे मजुरांना शेतात ने-आण करण्याचा खर्चही करावा लागत आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकर्‍यांच्या शेतात अजूनही सोयाबीन काढण्यासाठी, कापूस वेचणीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढजिल्ह्यात गतवर्षी ३ ते ५ रुपये किलो वेचणीचा दर आता ६ ते ८ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरीता ६00 ते ८00 रुपयाचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणार्‍या शेतकर्‍यांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांना हा दर देणे शक्य आहे; पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

टॅग्स :agricultureशेती