शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 08:54 IST

मन प्रकल्पातंर्गत सिंचन क्षेत्रामध्ये येत असलेल्या शिर्ला नेमाने आणि कंचनपूर गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

ठळक मुद्देशिर्ला नमाणे, कंचनपूरच्या शेतकर्यांना हवे मन प्रकल्पाचे पाणी

बुलडाणा : मन प्रकल्पातंर्गत सिंचन क्षेत्रामध्ये येत असलेल्या शिर्ला नेमाने आणि कंचनपूर गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.यासंदर्भात  दोन्ही गावातील शेतकर्यांनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. मन प्रकल्पातंर्गत या दोन्ही गावातील सिंचन क्षेत्र येते. मात्र यावर्षीमागणी करूनही गावाला पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. दरवर्षी पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. मात्र यावर्षी ते देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते देण्यात यावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे. त्यातच शेगाव संस्थांनालाही या प्रकल्पावरून पाणी दिल्या जाते. त्यांनीही यावेळी जादा पाण्याची मागणी केली आहे. परिणामी या दोन्ही गावातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी न मिळाल्यामुळे शेतकर्यांची उभी तूर जळून जात आहे तर गव्हाचेही पिक शेतकर्यांना घेता आलेले नाही. त्यामुळे प्रकरणी उपाययोजना करून मन प्रकल्पातील १.५ दलघमी पाणी आणि अन्य ठिकाणीसाठी आरक्षीत केलेले जादाचे पाणी शेती सिंचनासाठी द्यावे, अशी  शेतकर्यांची मागणी आहे. पाणी उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. शेतकर्यांनी जर आत्महत्या केली तर शासन त्यास जबाबदार राहील, असे या शेतकर्यांनी निवेदनात म्हंटले आहे. बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे यांना यांना यासंदर्भात मंगळवारी हे निवेदन देण्यात आले आहे. दत्तात्रय नेमाने, गणेश कचरे, रामदास शेगोकार, बाळू आवरे, अ‍ॅड. सतिषचंद्र रोठे, उमेश शिंदे, रामेश्वर शिंदे, भीमराव आवारे यांच्यासह अन्य शेतकर्यांनी ही मागणी करणारने निवेदन दिले आहे.