शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी ‘वखरले’ वावर!

By admin | Updated: July 7, 2015 00:04 IST

पावसाअभावी पिके सुकली; दुबार पेरणीचे संकट.

जयदेव वानखडे/ जळगाव जामोद : मृग नक्षत्राच्या मृहूर्तावर पाऊस आल्याने काही शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या साधल्या. पिके वर आली; मात्र त्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या उलटल्या आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील अशा शेतकर्‍यांनी पेरलेले शेत ह्यवखरणेह्ण सुरू केले असून, त्यांनी केलेला पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे. आता दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्वच पेरण्या पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. १२ जूननंतर तालुक्यात पाऊस नसल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी ही सर्वच पिके धोक्यात आली आहेत. आसलगाव शिवारातील मनोरमा इंगळे यांच्या मालकीच्या सहा एकर शेतातील तूर, सोयाबीन सुकल्यामुळे सोमवारी त्यांनी वावरात वखर घातला. अशी स्थिती सर्वत्र येण्याची शक्यता आहे. खेर्डा येथील शेतकरी गोपाल उमरकर, जळगाव जामोदचे समाधान नानकदे, आसलगावचे पुरुषोत्तम भुसारी अशा अनेक शेतकर्‍यांनी पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागणार असल्याची भीती व्यक्त केली. शेती वखरल्यानंतर पेरणीचा सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.