शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:41 IST

Crop insurance News नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.

ठळक मुद्देपीक विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर. आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  खरीप हंगामात माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. पीक विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर असून, शेतकऱ्यांकडे आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. त्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा याेजना राबविण्यात येते. खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. ऑक्टाेबर, नाेव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, रब्बीचा पीक विमा काढण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.

निकषाचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमा काढूनही मदत मिळालेली नाही. विमा कंपनीचे निकष शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहेत. त्यामळे, रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विम्याची भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.      -  सुधाकर राऊत, अंजनी बु.

नुकसान भरपाईची प्रतीक्षाच खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिकांचा विमा काढला हाेता. खरिपातील मूग, उडीद आणि साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मूग, उडिदाच्या शेंगांना काेंब फुटले हाेते. खरिपाची जवळपास सर्वच पिके हातून गेल्यावरही अनेक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच आहे. मदत मिळेल किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांना माहिती नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा