शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:47 IST

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून, फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म  सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प भूमीधारी शेतकरी व  अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकºयांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकºयांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. राज्यात प्रामुख्याने  नारळ, चिकु, सुपारी, केळी, पपई, पेरु, द्राक्ष, डाळींब, सिताफळ, लिंबू, मोसंबी, संत्रा, आंबा,  सिताफळ, बोर, आवळा, पपई आदी फळपिके घेतली जातात.  दुष्काळी परिस्थिीमुळे कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा  टिकवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.  उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनद्वारे फळबागा  जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड पाच लिटर क्षमतेचे दोन ते चार मटक्याचा उपयोग करावा.  मटक्याच्या तळाशी  छिद्र पाडून  त्यामध्ये कपड्याची  गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील, अशा बेताने ज्या भागात झाडाची तंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी १२ वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरवावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ठिबक सिंचनासोबत आच्छादनाचा  वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आटोक्यात येईल.  जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूपदेखील कमी होईल. आच्छादनासाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, सोयाबीनचा भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, केळीची वाळलेली पाने, तुरकाड्या,  लाकडाचा भूसा आदींचा उपयोग करता येतो.  अशा नैसर्गिक आच्छादनाची जाडी ही १२ ते १५ सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे, अशी माहिती कृषि विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी