शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:40 IST

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू कापासाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेक शेतातील कापूस ओला झाला. काही ठिकाणी कापसाची बोंडे भिजली. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २६३ आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. जिल्हाभर झालेल्या पावसाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतो. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

पांढºया सोन्याला सुर्याची उबकिनगाव जट्टू: परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाने भिजलेला कापूस वाळविण्याची कसरत शेतकºयांची सुरू आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकºयांनी कापासाची वेचणी सुरू केली. परंतू ओला कापूस दाबून पिवळा पडेल, अगोदारच कापसाचे दर कमी त्यामुळे शेतकरी ओल्या कापासाला वाळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

१०७ टक्के कपाशी पेराजिल्ह्यात कपाशीचा पेरा १०७ टक्के म्हणजे २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. परंतू पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. कपाशीच्या बोंडालाच कोंब आले आहेत. दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्यानंतर आता पावसाचा फटका कपाशी उत्पादनाला बसला आहे.

कापूस वेचण्यासाठी मिळेना मजूरपावसामुळे कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाच्या उघडीपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजूरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिली वेचणी सोबतच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेतीcottonकापूस