शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:40 IST

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू कापासाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेक शेतातील कापूस ओला झाला. काही ठिकाणी कापसाची बोंडे भिजली. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २६३ आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. जिल्हाभर झालेल्या पावसाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतो. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

पांढºया सोन्याला सुर्याची उबकिनगाव जट्टू: परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाने भिजलेला कापूस वाळविण्याची कसरत शेतकºयांची सुरू आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकºयांनी कापासाची वेचणी सुरू केली. परंतू ओला कापूस दाबून पिवळा पडेल, अगोदारच कापसाचे दर कमी त्यामुळे शेतकरी ओल्या कापासाला वाळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

१०७ टक्के कपाशी पेराजिल्ह्यात कपाशीचा पेरा १०७ टक्के म्हणजे २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. परंतू पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. कपाशीच्या बोंडालाच कोंब आले आहेत. दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्यानंतर आता पावसाचा फटका कपाशी उत्पादनाला बसला आहे.

कापूस वेचण्यासाठी मिळेना मजूरपावसामुळे कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाच्या उघडीपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजूरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिली वेचणी सोबतच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेतीcottonकापूस