शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:40 IST

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू कापासाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेक शेतातील कापूस ओला झाला. काही ठिकाणी कापसाची बोंडे भिजली. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २६३ आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. जिल्हाभर झालेल्या पावसाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतो. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

पांढºया सोन्याला सुर्याची उबकिनगाव जट्टू: परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाने भिजलेला कापूस वाळविण्याची कसरत शेतकºयांची सुरू आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकºयांनी कापासाची वेचणी सुरू केली. परंतू ओला कापूस दाबून पिवळा पडेल, अगोदारच कापसाचे दर कमी त्यामुळे शेतकरी ओल्या कापासाला वाळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

१०७ टक्के कपाशी पेराजिल्ह्यात कपाशीचा पेरा १०७ टक्के म्हणजे २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. परंतू पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. कपाशीच्या बोंडालाच कोंब आले आहेत. दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्यानंतर आता पावसाचा फटका कपाशी उत्पादनाला बसला आहे.

कापूस वेचण्यासाठी मिळेना मजूरपावसामुळे कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाच्या उघडीपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजूरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिली वेचणी सोबतच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेतीcottonकापूस