शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

मक्याच्या नोंदणीसाठी बोचऱ्या थंडीत जागून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:47 IST

Buldhana Agriculture News रविवार दिवस आणि रात्रभर बोचऱ्या थंडीचा सामना शेतकऱ्यांनी केला.

- सुहास वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरा : आधी रात्रंदिवस काबाडकष्ट करून पीक पिकवायचे व मग  हमीभाव मिळावा म्हणून  फक्त नोंदणीसाठी रात्रभर  बोचऱ्या थंडीत  काढून दिवसभर ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता संघर्ष करण्याची वेळ नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर शासन व प्रशासनाने आणल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. खरेदी विक्री संघात हमीभावाने मक्याच्या खरेदी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सोमवारी सुरू झाली. त्यासाठी चोवीस तासापूर्वीच म्हणजे रविवारी सकाळापासूनच खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रांग तयार केली. रविवार दिवस आणि रात्रभर बोचऱ्या थंडीचा सामना शेतकऱ्यांनी केला. दिवसभर तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज सादर केले.  व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात मक्याची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. सोमवारी सकाळीच मोठी गर्दी झाली. त्यासाठी चक्क ठाणेदार व पोलिसांना बोलावून गर्दी नियंत्रित करावी लागली.  शासन व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी रात्रंदिवस जागून संघर्ष करावा लागत असल्याचे पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त  केला. 

मागील वर्षी हमीभाव न मिळाल्याने झाली गर्दीमक्याची हमीभावाने खरेदी उशिराने सुरु होऊन फक्त दोन महिने एवढय़ा कालावधीत चालते. त्यामध्ये खरेदी विक्री संघाची मोजण्याची क्षमता कमी असल्याने मागीलवर्षी उशिरा नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्या  मक्याची मोजणी झाली नाही व त्यांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी यावेळेस एकच गर्दी करून पहिला नंबर  मिळविण्याचा प्रयत्न केल्याने सर्व गोंधळ उडाला होता. 

पहिल्याच दिवशी एक हजार अर्ज नोंदणीसाठी झालेले गर्दी पाहता खरेदी विक्री संघ कार्यालयातील काम थांबवून खासगी कंपनीला  दिल्याची माहिती सहाय्यक निबंधक  कृपलानी यांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी खाजगी शेतकरी कंपनी करणार आहे. 

केंद्रातून ऑनलाइन नोंदणीचा पर्याय प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून गावातूनच नोंदणी करण्याचा पर्याय उपल ब्ध केल्यास  शेतकर्यांना त्रास झाला नसता. यापुढे गावातूनच ऑनलाईन नोंदणीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे  झाले आहे.