शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

शेतकऱ्यांचे पाण्यात बसून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या ...

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या पाण्यावर शेतकरी सिंचन करत आहे; मात्र प्रशासनाच्या लेट लतीफ कारवाईमुळे या प्रकल्पाचे कालव्याचे काम अजूनही अर्धवट आहे. हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात आला नाही. त्यामुळे या कालव्याच्या देखभाल दुरुस्ती करिता आर्थिक तरतूद नसल्यामुळे या कालव्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. या कालव्याला ठिकठिकाणी पाझर फुटले आहेत. यामुळे कालव्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असून नापीक बनत आहेत. या कालव्यामध्ये बाभळी, निंबाची झाडे, गवत वर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटर पर्यंत पाणी कालव्याद्वारे न नेता पाईपलाईनद्वारे नेण्यात यावे, या मागणीकरिता शुक्रवारी सकाळी पेनटाकळी प्रकल्पातील पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी एकनाथ सास्ते, गजानन अवचार, प्रभाकर अवचार, काशिनाथ वाहेकर, संजय वाहेकर, दत्तात्रय वाहेकर, दीपक पागोरे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, गजानन रहाटे, सतीश मस्के, गणेश रहाटे, गजानन रहाटे, दत्तात्रय काळे, सागर रहाटे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करावा

या कालव्याचे काम पूर्ण करून हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात यावा. जेणेकरून त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे प्रशासन वेळेवर करेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कालव्याला पेनटाकळी शिवारात भगदाड पडल्याने फुटला होता. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच याशिवाय शेती खरडून गेली आहे. या कालव्याद्वारे असेच पाणी सोडले तर आणखी काही ठिकाणी हा कालवा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होईल.