शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकऱ्यांचे पाण्यात बसून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या ...

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या पाण्यावर शेतकरी सिंचन करत आहे; मात्र प्रशासनाच्या लेट लतीफ कारवाईमुळे या प्रकल्पाचे कालव्याचे काम अजूनही अर्धवट आहे. हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात आला नाही. त्यामुळे या कालव्याच्या देखभाल दुरुस्ती करिता आर्थिक तरतूद नसल्यामुळे या कालव्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. या कालव्याला ठिकठिकाणी पाझर फुटले आहेत. यामुळे कालव्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असून नापीक बनत आहेत. या कालव्यामध्ये बाभळी, निंबाची झाडे, गवत वर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटर पर्यंत पाणी कालव्याद्वारे न नेता पाईपलाईनद्वारे नेण्यात यावे, या मागणीकरिता शुक्रवारी सकाळी पेनटाकळी प्रकल्पातील पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी एकनाथ सास्ते, गजानन अवचार, प्रभाकर अवचार, काशिनाथ वाहेकर, संजय वाहेकर, दत्तात्रय वाहेकर, दीपक पागोरे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, गजानन रहाटे, सतीश मस्के, गणेश रहाटे, गजानन रहाटे, दत्तात्रय काळे, सागर रहाटे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करावा

या कालव्याचे काम पूर्ण करून हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात यावा. जेणेकरून त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे प्रशासन वेळेवर करेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कालव्याला पेनटाकळी शिवारात भगदाड पडल्याने फुटला होता. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच याशिवाय शेती खरडून गेली आहे. या कालव्याद्वारे असेच पाणी सोडले तर आणखी काही ठिकाणी हा कालवा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होईल.