शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शेतकऱ्यांचे पाण्यात बसून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या ...

पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या पाण्यावर शेतकरी सिंचन करत आहे; मात्र प्रशासनाच्या लेट लतीफ कारवाईमुळे या प्रकल्पाचे कालव्याचे काम अजूनही अर्धवट आहे. हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात आला नाही. त्यामुळे या कालव्याच्या देखभाल दुरुस्ती करिता आर्थिक तरतूद नसल्यामुळे या कालव्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. या कालव्याला ठिकठिकाणी पाझर फुटले आहेत. यामुळे कालव्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असून नापीक बनत आहेत. या कालव्यामध्ये बाभळी, निंबाची झाडे, गवत वर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटर पर्यंत पाणी कालव्याद्वारे न नेता पाईपलाईनद्वारे नेण्यात यावे, या मागणीकरिता शुक्रवारी सकाळी पेनटाकळी प्रकल्पातील पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी एकनाथ सास्ते, गजानन अवचार, प्रभाकर अवचार, काशिनाथ वाहेकर, संजय वाहेकर, दत्तात्रय वाहेकर, दीपक पागोरे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, गजानन रहाटे, सतीश मस्के, गणेश रहाटे, गजानन रहाटे, दत्तात्रय काळे, सागर रहाटे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करावा

या कालव्याचे काम पूर्ण करून हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात यावा. जेणेकरून त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे प्रशासन वेळेवर करेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कालव्याला पेनटाकळी शिवारात भगदाड पडल्याने फुटला होता. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच याशिवाय शेती खरडून गेली आहे. या कालव्याद्वारे असेच पाणी सोडले तर आणखी काही ठिकाणी हा कालवा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होईल.