शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनो, पावसाळा लांबला; चिंता नाही!

By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST

१५ जुलैपर्यंत करा पेरणी : कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

जयदेव वानखडे / जळगाव जामोदमृग नक्षत्र संपले तरी मान्सुनचा पाऊस आला नाही म्हणून शेतकरी हवालदिल होवून आता पुढे काय पेरायचे ह्या चिंतेत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. आपत्कालीन पीक नियोजन करून परिस्थितीला सामोरे जाणे हेच हितावह आहे. कृषी हवामान शास्त्रीय दृष्टीकोनातून विदर्भ विभाग प्रामुख्याने तीन हवामान उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि जास्त पावसाचा प्रदेश असे असले तरी सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयापासून मिळणारा पाऊस हा संपूर्ण विदर्भात एकाचवेळी पडतो. पावसाच्या प्रमाणात मात्र बदल असतो. कमी दाबाचा पट्टा जेव्हा संपूर्ण विदर्भावर नसतो तेव्हा मात्र विदर्भातील पावसाच्या प्रमाणात जिल्हा तसेच तालुकानिहाय मोठय़ा प्रमाणावर बदल आढळून येतात. नियमित पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा साधारण तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पाऊस पोहचतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. परंतु यावर्षी नियमित वेळेवर मोसमी पावसाला सुरूवात झाली नाही. पावसाळा जर एक ते दोन आठवडे उशीरा सुरू म्हणजेच (२५ जून ते १ जुलै) पर्यंत झाला तर पीक नियोजनात कोणतेही बदल करण्याची गरज नसते म्हणून शेतकरी बंधुंनी पाऊस सुरू होण्याची वाट पाहून पेरणीयोग्य पाऊस १ जुलैपर्यंत झाल्यास जी पीके आपण घेणार आहोत त्या पिकांची विद्यापीठाचे शिफारशीनुसार पेरणी करावी त्यात बदल करण्याची गरज नाही. परंतु १ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास पीक नियोजनात काही बदल करून पेरणी करावी लागेल जेणेकरून अशा परिस्थितीतही आपण चांगले उत्पादन घेऊन परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यात यशस्वी होवून परिस्थिती सुसह्य होईल. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जा. मार्फत करण्यात आले आहे. पाऊस उशिराने आला तरी पीक नियोजन बदल करून चांगले उत्पन्न घेता येते. तर १५ जुलैपर्यंत पेरणीचा योग्य काळ आहे.