शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

शेतकर्‍यांनो, पावसाळा लांबला; चिंता नाही!

By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST

१५ जुलैपर्यंत करा पेरणी : कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

जयदेव वानखडे / जळगाव जामोदमृग नक्षत्र संपले तरी मान्सुनचा पाऊस आला नाही म्हणून शेतकरी हवालदिल होवून आता पुढे काय पेरायचे ह्या चिंतेत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. आपत्कालीन पीक नियोजन करून परिस्थितीला सामोरे जाणे हेच हितावह आहे. कृषी हवामान शास्त्रीय दृष्टीकोनातून विदर्भ विभाग प्रामुख्याने तीन हवामान उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि जास्त पावसाचा प्रदेश असे असले तरी सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयापासून मिळणारा पाऊस हा संपूर्ण विदर्भात एकाचवेळी पडतो. पावसाच्या प्रमाणात मात्र बदल असतो. कमी दाबाचा पट्टा जेव्हा संपूर्ण विदर्भावर नसतो तेव्हा मात्र विदर्भातील पावसाच्या प्रमाणात जिल्हा तसेच तालुकानिहाय मोठय़ा प्रमाणावर बदल आढळून येतात. नियमित पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा साधारण तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पाऊस पोहचतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. परंतु यावर्षी नियमित वेळेवर मोसमी पावसाला सुरूवात झाली नाही. पावसाळा जर एक ते दोन आठवडे उशीरा सुरू म्हणजेच (२५ जून ते १ जुलै) पर्यंत झाला तर पीक नियोजनात कोणतेही बदल करण्याची गरज नसते म्हणून शेतकरी बंधुंनी पाऊस सुरू होण्याची वाट पाहून पेरणीयोग्य पाऊस १ जुलैपर्यंत झाल्यास जी पीके आपण घेणार आहोत त्या पिकांची विद्यापीठाचे शिफारशीनुसार पेरणी करावी त्यात बदल करण्याची गरज नाही. परंतु १ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास पीक नियोजनात काही बदल करून पेरणी करावी लागेल जेणेकरून अशा परिस्थितीतही आपण चांगले उत्पादन घेऊन परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यात यशस्वी होवून परिस्थिती सुसह्य होईल. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जा. मार्फत करण्यात आले आहे. पाऊस उशिराने आला तरी पीक नियोजन बदल करून चांगले उत्पन्न घेता येते. तर १५ जुलैपर्यंत पेरणीचा योग्य काळ आहे.