शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महाराष्ट्रात ६० हजार कोटीचा किसान विमा घोटाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 10:50 PM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले.

जळगाव जामोद :  गेल्या पाच वर्षात भाजपा शासनाने महाराष्ट्रात जेवढे शासकीय दवाखाने, शाळा उघडल्या नसतील त्यापेक्षा जास्त पक्षाची कार्यालये उघडली. हे सरकार घोटाळेबाज असून यांनी महाराष्ट्रात ६० हजार कोटी रूपयांचा किसान विमा घोटाळा केला. विम्याचे नावावर एवढा प्रचंड पैसा शेतक-यांजवळून जमा केला तर केवळ ९ हजार कोटी विमा वाटला तर इतर पैसा गेला कोठे? असा सवाल काँग्रेसचे युवा नेते, हार्दिक पटेल यांनी केला. जळगाव जामोद येथे ५ सप्टेंबर रोजी भा.रा.काँ., रा.काँ., स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाचेवतीने आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी रामविजय बुरूंगले, रा.काँ. सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यासह काँग्रेसचे प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रंगराव देशमुख, डॉ.दलाल, मिना सातव तथा मतदार संघातील मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षात देशात ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यांनी शेतक-यांना बरबाद केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी इतर युवा नेत्यांची सुद्धा भाषणे झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जातीपेक्षा विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांच्या तुरीचे हरभºयाचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. सभेला प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा