शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:05 IST

मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यावर्षी सुरूवातीपासूच दमदार पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन वाढले; परंतु मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आहे.

गत चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊसच नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस चांगला पिकांची वाढ चांगली झाली. खासकरून सोयाबीन उत्पादक शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले.  परंतु ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन उभे होते, त्यांच्या पिकाची काढणी सध्या सुरू आहे. गत १५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. यावर्षी अनेक शेतकºयांना एकरी ५ ते ७ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे सध्या करण्यात येत असलेल्या सोयाबीनच्या काढणीवरून दिसून येते. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तरी बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला हजार ते १५०० रूपये प्रतिक्विंटलचे भाव मिळत आहेत. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळायला टाकण्याचे आव्हानही शेतकºयांसमोर आहेच. गतवर्षी सोयाबनीची झडती एकरी दोन क्विंटलच्या वर नव्हती. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची काढणीही न करता शेतात थेट रोटावेटर मारले होते. त्यामुळे गतवर्षीच्या मानाने यावर्षी सोयाबीनची झडती बºयापैकी आहे, मात्र भाव अत्यल्प मिळत असल्याने उत्पादन असून-नसून काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येते. एकीकडे सोयाबीन ४ हजार रूपये प्रतिक्विंटलचे भाव अपेक्षित असताना, मालाची प्रतवारी खराब असल्याने केवळ २५ टक्के किंमतीतच सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे सरासरी ७५ टक्के नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचा विचार न करता त्यातून शेतकºयांचे होणारे प्रचंड नुकसान लक्षात घेता, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळण्याची नितांत गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी