शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पीक कर्जासाठी थेट बँकांनाच देणार शेतक-यांची कागदपत्रे!

By admin | Updated: April 23, 2017 01:08 IST

बुलडाणा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम

विवेक चांदूरकरबुलडाणा : खरीप हंगामासाठी पिककर्ज काढताना शेतकर्‍यांना आता तलाठय़ांच्या मागे फिरण्याची गरज राहणार नसून, सातबारासह शेतकर्‍यांची पिककर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सरळ बँकांकडे पोहोचविण्यात येणार आहे. बुलडाणा तहसलदारांनी हा निर्णय घेतला कर्जवाटप करणार्‍या बॅकांकडून शेतकर्‍यांची यादी मागविण्यात आली आहे. जून महिन्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीला प्रारंभ होतो. या हंगामाकसाठी पीक कर्ज घेण्याकरिता मे महिन्यापासून शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांकडून अद्यावत सातबारा, आठ अ, हैसीयत दाखला यासह विविध कागदपत्रे घ्यावी लागतात. बहुतेक तलाठय़ांकडे दोन ते तीन गावांचा प्रभार असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना ही कागदपत्रे मिळविण्याकरिता तलाठय़ांच्या मागे चकरा माराव्या लागतात. या दरम्यान शेतकर्‍यांची पिळवणूकही होते. या सर्व प्रकारास आळा घालण्याकरिता तहसीलदार सुरेश बगळे यांनी पुढाकार घेतला असून, तहसीलदारांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांना बुलडाणा तहसील अंतर्गत पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची यादी मागविली आहे. शेतकर्‍यांचे सातबारा, आठ-अ व हैसीयतचा दाखला तहसील कार्यालय तयार करणार आहे. संपूर्ण दाखले ई-महासेवा केंद्रावरून काढून ते सरळ बँकांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. परिणामी बँकांना शेतकर्‍यांचे अद्ययावत कागदपत्रे एकाच वेळी मिळतील व पीक कर्ज देण्यासाठी सोईचे होईल. राज्यातील पहिलाच प्रयोग! -राज्यात खरीप हंगामात लाखो शेतकरी पीक कर्ज घेतात. शेतकर्‍यांना नवीन कर्ज घेण्याकरिता काही कागदपत्रांची गरज असते. त्याकरिता त्यांना तलाठय़ांच्या मागे फिरून पैसेही द्यावे लागतात. याबाबत अनेकदा शेतकर्‍यांनी तक्रारी दिल्या आहेत. तसेच आंदोलनही केले आहे. मात्र, याची कुणीही दखल घेतली नाही. या शेतकर्‍यांची कागदपत्रे थेट बँकांमध्ये पोहोचविण्याचा बुलडाणा तहसिलदारांचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. कागदपत्रांसाठी बनविणार विशेष यंत्रणा! बँकांकडून शेतकर्‍यांची यादी घेऊन त्यांची कागदपत्रे तयार करण्याकरिता तहसील कार्यालयात विशेष यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील मधील कर्मचारी तथा तलाठय़ांचा यामध्ये समावेश असणार आहे.शेतकर्‍यांना पीक कर्ज घेताना सातबारासह विविध कादगपत्र गोळा करावे लागतात. शेतकर्‍यांचा हा त्रास कमी करण्याकरिता आम्ही सरळ बँकांकडून पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची यादी घेऊन बँकेत कागदपत्र पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही कागदपत्रे तयार करण्याकरिता काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल. यामुळे शेतकर्‍यांचा त्रास वाचणार आहे. - सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा