शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:15 IST

मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.

ठळक मुद्देनागोलकर यांचे आवाहन प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशशेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.यावेळी त्यांनी अभंग प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा  संदेशदेखील देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.  श्रावणमासानिमित्त मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे दररोज  रात्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात  बाबुराव महाराज नागोलकर,  भगवान महाराज लिखी, बळीराम महाराज अल्हाट यांचे प्रवचन  सुरू आहे. या प्रवचनातून हा संदेश व मार्गदर्शन करण्यात येत  आहे. प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,  कमी खर्चात शेती कशी करावी, कोणती बाजारपेठ पीक  विक्रीसाठी योग्य राहील, फळबागेविषयी माहिती, तसेच धार्मिक  प्रवचनही करण्यात येते. या कार्यक्रमाचा दररोज शेकडो भाविक,  शेतकरी महिला, लाभ घेतात. यावेळी सेवानवृत्त तालुका कृषी  अधिकारी मधुकर काळे हे सेवानवृत्त झाले असतानासुद्धा शे तकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. शेतकर्‍यांना येणार्‍या  अडीअडचणी मधुकर काळे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांशी  संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुकर काळे  यांचे कार्य पाहता त्यांचा गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात  आला. या कार्यक्रमाला रमेश सावजी, वैराळ, धांडे, सिरसाट, शिवाजी  अल्हाट, पांडुरंग काळे, सुरेश अल्हाट, नवजीवन कनिष्ठ  महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, शिवाजी अल्हाट,  नारायण नागोलकर, डॉ. वसंता नागोलकर, अर्जुन पिंपळे, डॉ.  वनस्कर, डॉ. पांडुरंग अल्हाट, प्रकाश खोडवे, नामदेव राऊत,  मदन नागोलकर,  मनोहर टोनपे, मोतीराम अल्हाट, दत्ता  नागोलकर, संजय जाधव, सुखदेव अल्हाट, यादव अल्हाट,  भागवत राऊत, रामभाऊ कांबळे, अरविंद जोशी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन बाबुराव महाराज नागोलकर यांनी केले. तर  आभारप्रदर्शन विलास पायघन, किरण पारीस्कर यांनी केले.  कार्यक्रमाला महिला, पुरुष, भाविक व गावकरी मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.