शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:15 IST

मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.

ठळक मुद्देनागोलकर यांचे आवाहन प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशशेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.यावेळी त्यांनी अभंग प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा  संदेशदेखील देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.  श्रावणमासानिमित्त मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे दररोज  रात्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात  बाबुराव महाराज नागोलकर,  भगवान महाराज लिखी, बळीराम महाराज अल्हाट यांचे प्रवचन  सुरू आहे. या प्रवचनातून हा संदेश व मार्गदर्शन करण्यात येत  आहे. प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,  कमी खर्चात शेती कशी करावी, कोणती बाजारपेठ पीक  विक्रीसाठी योग्य राहील, फळबागेविषयी माहिती, तसेच धार्मिक  प्रवचनही करण्यात येते. या कार्यक्रमाचा दररोज शेकडो भाविक,  शेतकरी महिला, लाभ घेतात. यावेळी सेवानवृत्त तालुका कृषी  अधिकारी मधुकर काळे हे सेवानवृत्त झाले असतानासुद्धा शे तकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. शेतकर्‍यांना येणार्‍या  अडीअडचणी मधुकर काळे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांशी  संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुकर काळे  यांचे कार्य पाहता त्यांचा गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात  आला. या कार्यक्रमाला रमेश सावजी, वैराळ, धांडे, सिरसाट, शिवाजी  अल्हाट, पांडुरंग काळे, सुरेश अल्हाट, नवजीवन कनिष्ठ  महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, शिवाजी अल्हाट,  नारायण नागोलकर, डॉ. वसंता नागोलकर, अर्जुन पिंपळे, डॉ.  वनस्कर, डॉ. पांडुरंग अल्हाट, प्रकाश खोडवे, नामदेव राऊत,  मदन नागोलकर,  मनोहर टोनपे, मोतीराम अल्हाट, दत्ता  नागोलकर, संजय जाधव, सुखदेव अल्हाट, यादव अल्हाट,  भागवत राऊत, रामभाऊ कांबळे, अरविंद जोशी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन बाबुराव महाराज नागोलकर यांनी केले. तर  आभारप्रदर्शन विलास पायघन, किरण पारीस्कर यांनी केले.  कार्यक्रमाला महिला, पुरुष, भाविक व गावकरी मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.