शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:15 IST

मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.

ठळक मुद्देनागोलकर यांचे आवाहन प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशशेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.यावेळी त्यांनी अभंग प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा  संदेशदेखील देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.  श्रावणमासानिमित्त मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे दररोज  रात्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात  बाबुराव महाराज नागोलकर,  भगवान महाराज लिखी, बळीराम महाराज अल्हाट यांचे प्रवचन  सुरू आहे. या प्रवचनातून हा संदेश व मार्गदर्शन करण्यात येत  आहे. प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,  कमी खर्चात शेती कशी करावी, कोणती बाजारपेठ पीक  विक्रीसाठी योग्य राहील, फळबागेविषयी माहिती, तसेच धार्मिक  प्रवचनही करण्यात येते. या कार्यक्रमाचा दररोज शेकडो भाविक,  शेतकरी महिला, लाभ घेतात. यावेळी सेवानवृत्त तालुका कृषी  अधिकारी मधुकर काळे हे सेवानवृत्त झाले असतानासुद्धा शे तकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. शेतकर्‍यांना येणार्‍या  अडीअडचणी मधुकर काळे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांशी  संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुकर काळे  यांचे कार्य पाहता त्यांचा गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात  आला. या कार्यक्रमाला रमेश सावजी, वैराळ, धांडे, सिरसाट, शिवाजी  अल्हाट, पांडुरंग काळे, सुरेश अल्हाट, नवजीवन कनिष्ठ  महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, शिवाजी अल्हाट,  नारायण नागोलकर, डॉ. वसंता नागोलकर, अर्जुन पिंपळे, डॉ.  वनस्कर, डॉ. पांडुरंग अल्हाट, प्रकाश खोडवे, नामदेव राऊत,  मदन नागोलकर,  मनोहर टोनपे, मोतीराम अल्हाट, दत्ता  नागोलकर, संजय जाधव, सुखदेव अल्हाट, यादव अल्हाट,  भागवत राऊत, रामभाऊ कांबळे, अरविंद जोशी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन बाबुराव महाराज नागोलकर यांनी केले. तर  आभारप्रदर्शन विलास पायघन, किरण पारीस्कर यांनी केले.  कार्यक्रमाला महिला, पुरुष, भाविक व गावकरी मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.