शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील शेतकऱ्याना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा - भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. ...

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, श्वेता महाले, राजेश एकडे यांनीही सहभाग घेतला होता. यासोबतच कृषी सचिव एकनाथ डवले, किसान सभेचे अजित नवले, अजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटे, मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे प्रामुख्याने उपस्थित होते.

पीक विम्या संदर्भातील प्रकरणांची योग्य पद्धतीने शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजीही यंत्रणांनी घ्यावी, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही बुलडाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर मिळावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

--योजनेत धोरणात्मक बदल करावे- गायकवाड--

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या योजनेमध्ये काही धोरणात्मक बदल करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी या बैठकीत केली. योजनेत जोखीमस्तर ७० टक्के ठेवलेला आहे. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यामुळे तो वाढवून ८५ टक्के करण्यात यावा. उंबरठा उत्पन्नही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न गृहीत धरून काढावे, पीक काढेपर्यंत तरतूद लागू करावी, नुकसान झाल्यानंतर त्याची सूचना प्रथमत: कृषी विभागामार्फत देण्यात यावी व नंतर सात दिवसांत सर्व शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याबाबतचा नियम करण्यात यावा, यासह आणखी काही धोरणात्मक बदल यामध्ये आ. गायकवाड यांनी सुचविलेले आहेत.