शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

तूर खरेदीत भरडला जातोय शेतकरी!

By admin | Updated: April 24, 2017 00:27 IST

मोजणीनंतर पैशासाठीही करावी लागत आहे दीर्घ प्रतीक्षा

संदीप गावंडे - नांदुरासध्या जिल्ह्यात तसेच राज्यातही तूर उत्पादक शेतकऱ्यांवर कधी नव्हे एवढी कठीण परिस्थिती आली आहे. तूर विक्रीकरिता एक ते दीड महिन्यांचा प्रतीक्षेचा कालावधी, विक्रीनंतर बँक खात्यात तुरीचा चेक जमा व्हायचा पंधरा दिवसाचा काळ व पैसे जमा झाल्यावर बँकातून मिळणारे केवळ १० ते २० हजार अशा दुष्टचक्रात सध्या शेतकरी अडकलेला असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. आता सहनशीलता संपत असल्याने कुठे आंदोलने, तर कुठे आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आपला देश हा कृषीप्रधान आहे, असे आपण बिरुद मिरवतो; परंतु ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या भरवशावर आपण कृषीप्रधान म्हणून मिरवतो, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आज शासन तसेच प्रशासनालाही राहिली नसल्याचा प्रत्यय सध्याच्या तूर खरेदीतील दीर्घ विलंब व त्यात घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे येत आहे. एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीला आणली असून, उन्हातान्हात तुरीची रखवाली करणे सुरू आहे. प्रत्येक घरातील दोन व्यक्ती रात्री व दिवसा असे तुरीच्या गंजीवर अडकले असून, आज ना उद्या मोजमाप होईल, अशी आशा त्यांना लागून आहे. अशातच रात्रीच्या अंधारात गैरमार्गानी तूर मोजणी करताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्यावरही सदर प्रकार दाबण्याचा झालेला प्रयत्न, शेतकऱ्यांची चोरीला गेलेली २३ कट्टे तूर, या प्रकारामुळे नांदुरा येथील तूर खरेदी गाजत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येबाबत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन काय भूमिका घेत आहे, हे संपूर्ण तालुका पाहत आहे. नजिकच्या काळात निवडणुका नसल्याने लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांशी सध्यातरी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी भरडला जात असल्याचे दिसून येते.आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना...केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. मलकापूर व नांदुरा तालुक्याचे आमदार व खासदारही भाजपाचेच आहेत. भरीस भर राज्याचे कृषीमंत्री सुद्धा नांदुरा तालुक्याचेच सुपुत्र आहेत. अशा परिस्थितीत नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोणीच पुढे येत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच रास्ता रोको केला. पण, आंदोलने केल्यास लाठीचार्ज करण्याचा दम प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना देत असून, यामुळे ‘आई जेवू घालिना बाप भीक मागू देईना’ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे.