शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत भरडला जातोय शेतकरी!

By admin | Updated: April 24, 2017 00:27 IST

मोजणीनंतर पैशासाठीही करावी लागत आहे दीर्घ प्रतीक्षा

संदीप गावंडे - नांदुरासध्या जिल्ह्यात तसेच राज्यातही तूर उत्पादक शेतकऱ्यांवर कधी नव्हे एवढी कठीण परिस्थिती आली आहे. तूर विक्रीकरिता एक ते दीड महिन्यांचा प्रतीक्षेचा कालावधी, विक्रीनंतर बँक खात्यात तुरीचा चेक जमा व्हायचा पंधरा दिवसाचा काळ व पैसे जमा झाल्यावर बँकातून मिळणारे केवळ १० ते २० हजार अशा दुष्टचक्रात सध्या शेतकरी अडकलेला असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. आता सहनशीलता संपत असल्याने कुठे आंदोलने, तर कुठे आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आपला देश हा कृषीप्रधान आहे, असे आपण बिरुद मिरवतो; परंतु ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या भरवशावर आपण कृषीप्रधान म्हणून मिरवतो, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आज शासन तसेच प्रशासनालाही राहिली नसल्याचा प्रत्यय सध्याच्या तूर खरेदीतील दीर्घ विलंब व त्यात घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे येत आहे. एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीला आणली असून, उन्हातान्हात तुरीची रखवाली करणे सुरू आहे. प्रत्येक घरातील दोन व्यक्ती रात्री व दिवसा असे तुरीच्या गंजीवर अडकले असून, आज ना उद्या मोजमाप होईल, अशी आशा त्यांना लागून आहे. अशातच रात्रीच्या अंधारात गैरमार्गानी तूर मोजणी करताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्यावरही सदर प्रकार दाबण्याचा झालेला प्रयत्न, शेतकऱ्यांची चोरीला गेलेली २३ कट्टे तूर, या प्रकारामुळे नांदुरा येथील तूर खरेदी गाजत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येबाबत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन काय भूमिका घेत आहे, हे संपूर्ण तालुका पाहत आहे. नजिकच्या काळात निवडणुका नसल्याने लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांशी सध्यातरी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी भरडला जात असल्याचे दिसून येते.आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना...केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. मलकापूर व नांदुरा तालुक्याचे आमदार व खासदारही भाजपाचेच आहेत. भरीस भर राज्याचे कृषीमंत्री सुद्धा नांदुरा तालुक्याचेच सुपुत्र आहेत. अशा परिस्थितीत नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोणीच पुढे येत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच रास्ता रोको केला. पण, आंदोलने केल्यास लाठीचार्ज करण्याचा दम प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना देत असून, यामुळे ‘आई जेवू घालिना बाप भीक मागू देईना’ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे.