शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव; प्रशासन चांगलेच हादरले

By निलेश जोशी | Updated: October 30, 2023 17:53 IST

 सक्तीची वीज देयक वसुली थांबवावी : आ. संजय गायकवाड यांचा इशारा

बुलढाणा : वीज देयकांची सक्तीची वसुली थांबविण्यासह वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी केल्या जाणाऱ्या अवाजवी पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके व अन्य सहकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आ. संजय गायकवाड व शेतकऱ्यांनी अनपेक्षित धडक महावितरणच्या कार्यालयावर दिल्याने प्रशासनही चांगलेच हादरले होते.

यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस जिल्ह्यात पडलेला असतानाच शेतकरी रब्बीची कशीबशी जुळवाजुळव करत आहे. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी देयक देण्यात येत असून त्यांच्याकडून सक्तीने वीज देयकांची वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे वीज रोहित्रही मोठ्या प्रमाणावर जळत असून वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अयोग्य वागणूक मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला होता. परिणामी, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या कार्यालयावर ही धडक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली.

शेतकरी हित महत्त्वाचे : गायकवाडराज्यात आमच्या पक्षाचे सरकार असले तरी शेतकरी हितासाठी आपण कुठलीही तडजोड करत नाही. महावितरणने शेती व शेतकऱ्यांसंदर्भात चालवलेल्या अंदाधुंद कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरिपाच्या तोंडावर वीज रोहित्र जळाल्याने वेळेत वीजपुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बुलढाणा व मोताळा तालुक्यात अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी हिताची कामे महावितरणने आठ दिवसांमध्ये मार्गी लावावीत, असा अल्टिमेटमच आ. गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांना दिला. यावेळी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे युवा नेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, संदीप गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते.साडेचार कोटींचा निधी उपलब्धमहावितरणकडे आ. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेला साडेचार कोटींचा निधी वर्तमान स्थिती उपलब्ध आहे. त्यामुळे बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्यासंदर्भातील समस्या त्वरेने मार्गी लावण्यात याव्या, असे आ. गायकवाड यांनी स्पष्टपणे निर्देशित केले. डीपीसीमधूनही महावितरणला ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कोथळी प्रकरणाची चौकशी करणारकोथळी येथे गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी पैसे देऊनही शेतकऱ्यांना अधिकृत वीजपुरवठा केला जात नाही. या गंभीर प्रकाराची पोलखोल आ. संजय गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्याशी चर्चा करताना केली. त्याअनुषंगाने या प्रकरणात खोलात जाऊन आपण चौकशी करू, असेही कटके यांनी यावेळी सांगितले.