शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव; प्रशासन चांगलेच हादरले

By निलेश जोशी | Updated: October 30, 2023 17:53 IST

 सक्तीची वीज देयक वसुली थांबवावी : आ. संजय गायकवाड यांचा इशारा

बुलढाणा : वीज देयकांची सक्तीची वसुली थांबविण्यासह वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी केल्या जाणाऱ्या अवाजवी पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके व अन्य सहकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आ. संजय गायकवाड व शेतकऱ्यांनी अनपेक्षित धडक महावितरणच्या कार्यालयावर दिल्याने प्रशासनही चांगलेच हादरले होते.

यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस जिल्ह्यात पडलेला असतानाच शेतकरी रब्बीची कशीबशी जुळवाजुळव करत आहे. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी देयक देण्यात येत असून त्यांच्याकडून सक्तीने वीज देयकांची वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे वीज रोहित्रही मोठ्या प्रमाणावर जळत असून वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अयोग्य वागणूक मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला होता. परिणामी, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या कार्यालयावर ही धडक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली.

शेतकरी हित महत्त्वाचे : गायकवाडराज्यात आमच्या पक्षाचे सरकार असले तरी शेतकरी हितासाठी आपण कुठलीही तडजोड करत नाही. महावितरणने शेती व शेतकऱ्यांसंदर्भात चालवलेल्या अंदाधुंद कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरिपाच्या तोंडावर वीज रोहित्र जळाल्याने वेळेत वीजपुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बुलढाणा व मोताळा तालुक्यात अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी हिताची कामे महावितरणने आठ दिवसांमध्ये मार्गी लावावीत, असा अल्टिमेटमच आ. गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांना दिला. यावेळी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे युवा नेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, संदीप गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते.साडेचार कोटींचा निधी उपलब्धमहावितरणकडे आ. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेला साडेचार कोटींचा निधी वर्तमान स्थिती उपलब्ध आहे. त्यामुळे बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्यासंदर्भातील समस्या त्वरेने मार्गी लावण्यात याव्या, असे आ. गायकवाड यांनी स्पष्टपणे निर्देशित केले. डीपीसीमधूनही महावितरणला ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कोथळी प्रकरणाची चौकशी करणारकोथळी येथे गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी पैसे देऊनही शेतकऱ्यांना अधिकृत वीजपुरवठा केला जात नाही. या गंभीर प्रकाराची पोलखोल आ. संजय गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्याशी चर्चा करताना केली. त्याअनुषंगाने या प्रकरणात खोलात जाऊन आपण चौकशी करू, असेही कटके यांनी यावेळी सांगितले.