शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत वाऱ्या!

By admin | Updated: July 6, 2017 00:24 IST

अनेकांच्या पदरी पडत आहे निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीचा आदेश काढल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँकेत वाऱ्या सुरू झाल्या आहेत; मात्र निकष आडवे येत असल्याने अनेकांना बँकेची नकारघंटा ऐकावी लागत असून, पदरी निराशा पडत आहे.राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा नुकतीच केली असून, याबाबतचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपले कर्ज माफ झाले असेल, या आशेने अनेक शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येत आहेत; मात्र बँकेकडून त्यांना कर्जमाफीचे निकष सांगून टोलवून लावले जात आहे. केवळ २०१२ ते जून २०१६ या काळातील थकीत कर्जच व तेही दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी उर्वरित कर्ज भरावे लागणार आहेत. याशिवाय नवीन कर्जही मिळणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे. सदर कर्जमाफीबाबत विचारणा करण्यासाठी अनेक शेतकरी बँकेत येत असून, त्यांची गर्दी बँकेत दिसून येते, तर चौकशी करणाऱ्यांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना टोलवून लावण्याकडे त्यांचा कल वाढला आहे, तर मागिल आर्थिक वर्षातील कर्जसुद्धा माफ होणार नसल्याने नवीन कर्जासाठी त्याचा तातडीने भरणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज केवळ नवे-जुने होणार असल्याने अनेक जण कर्जाचा नादच सोडून देत असल्याचेसुद्धा दिसून येते.कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम !माझे सन २०१५-१६ मधील कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे, तर सन २०१६-१७ मधील कर्ज अद्याप भरलेले नाही. पुनर्गठीत कर्ज हे थकीत मानले जात नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मला मिळणार की नाही, याबाबत मला समजेनासे झाले आहे. लाभ मिळणार असेल तरी, फारसा उपयोग होणार नाही, हे निश्चित आहे. पुनर्गठीत झालेल्या कर्जापोटी बँकेने मागिल वर्षी पीक विम्याची रक्कमही परस्पर जमा करुन घेतली होती, अशी माहिती यावेळी एका शेतकऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.