शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत वाऱ्या!

By admin | Updated: July 6, 2017 00:24 IST

अनेकांच्या पदरी पडत आहे निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीचा आदेश काढल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँकेत वाऱ्या सुरू झाल्या आहेत; मात्र निकष आडवे येत असल्याने अनेकांना बँकेची नकारघंटा ऐकावी लागत असून, पदरी निराशा पडत आहे.राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा नुकतीच केली असून, याबाबतचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपले कर्ज माफ झाले असेल, या आशेने अनेक शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येत आहेत; मात्र बँकेकडून त्यांना कर्जमाफीचे निकष सांगून टोलवून लावले जात आहे. केवळ २०१२ ते जून २०१६ या काळातील थकीत कर्जच व तेही दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी उर्वरित कर्ज भरावे लागणार आहेत. याशिवाय नवीन कर्जही मिळणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे. सदर कर्जमाफीबाबत विचारणा करण्यासाठी अनेक शेतकरी बँकेत येत असून, त्यांची गर्दी बँकेत दिसून येते, तर चौकशी करणाऱ्यांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना टोलवून लावण्याकडे त्यांचा कल वाढला आहे, तर मागिल आर्थिक वर्षातील कर्जसुद्धा माफ होणार नसल्याने नवीन कर्जासाठी त्याचा तातडीने भरणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज केवळ नवे-जुने होणार असल्याने अनेक जण कर्जाचा नादच सोडून देत असल्याचेसुद्धा दिसून येते.कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम !माझे सन २०१५-१६ मधील कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे, तर सन २०१६-१७ मधील कर्ज अद्याप भरलेले नाही. पुनर्गठीत कर्ज हे थकीत मानले जात नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मला मिळणार की नाही, याबाबत मला समजेनासे झाले आहे. लाभ मिळणार असेल तरी, फारसा उपयोग होणार नाही, हे निश्चित आहे. पुनर्गठीत झालेल्या कर्जापोटी बँकेने मागिल वर्षी पीक विम्याची रक्कमही परस्पर जमा करुन घेतली होती, अशी माहिती यावेळी एका शेतकऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.