शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत वाऱ्या!

By admin | Updated: July 6, 2017 00:24 IST

अनेकांच्या पदरी पडत आहे निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीचा आदेश काढल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँकेत वाऱ्या सुरू झाल्या आहेत; मात्र निकष आडवे येत असल्याने अनेकांना बँकेची नकारघंटा ऐकावी लागत असून, पदरी निराशा पडत आहे.राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा नुकतीच केली असून, याबाबतचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपले कर्ज माफ झाले असेल, या आशेने अनेक शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येत आहेत; मात्र बँकेकडून त्यांना कर्जमाफीचे निकष सांगून टोलवून लावले जात आहे. केवळ २०१२ ते जून २०१६ या काळातील थकीत कर्जच व तेही दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी उर्वरित कर्ज भरावे लागणार आहेत. याशिवाय नवीन कर्जही मिळणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे. सदर कर्जमाफीबाबत विचारणा करण्यासाठी अनेक शेतकरी बँकेत येत असून, त्यांची गर्दी बँकेत दिसून येते, तर चौकशी करणाऱ्यांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना टोलवून लावण्याकडे त्यांचा कल वाढला आहे, तर मागिल आर्थिक वर्षातील कर्जसुद्धा माफ होणार नसल्याने नवीन कर्जासाठी त्याचा तातडीने भरणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज केवळ नवे-जुने होणार असल्याने अनेक जण कर्जाचा नादच सोडून देत असल्याचेसुद्धा दिसून येते.कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम !माझे सन २०१५-१६ मधील कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे, तर सन २०१६-१७ मधील कर्ज अद्याप भरलेले नाही. पुनर्गठीत कर्ज हे थकीत मानले जात नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मला मिळणार की नाही, याबाबत मला समजेनासे झाले आहे. लाभ मिळणार असेल तरी, फारसा उपयोग होणार नाही, हे निश्चित आहे. पुनर्गठीत झालेल्या कर्जापोटी बँकेने मागिल वर्षी पीक विम्याची रक्कमही परस्पर जमा करुन घेतली होती, अशी माहिती यावेळी एका शेतकऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.