शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांचा हल्लाबोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश ...

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत मेहकर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शनिवारी हल्लाबोल केला.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पावर मोठा कालवा असून, या कालव्याच्या माध्यमातून हजारो हेक्टरचे सिंचन केले जाते. यामध्ये शेतकरी गहू, हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमूग यांसह भाजीपाला पिकांना या कालव्याद्वारे सिंचन केले जाते. या कालव्याद्वारे रब्बी पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले होते; मात्र कालवा हा झाडेझुडपे व गवत याने वेढला असल्याने या कालव्याद्वारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवायचे असल्यास पाणी मोठ्या प्रमाणावर कालव्यात सोडावे लागते. तेव्हाच जेमतेम पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते; मात्र डिसेंबर महिन्यामध्ये सदर कालवा हा पेनटाकळी शिवारात कालव्याला भगदाड पडून कालवा फुटला होता. यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या कालव्याची दुरुस्ती करून पंधरा दिवसानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आले होते; मात्र या कालव्यात झाडेझुडपे व गवत असल्यामुळे हा कालवा परत फुटण्याची भीती वाटत असल्याने पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. मेहकर तालुक्यातील वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर आदी ठिकाणाहून शेकडो शेतकरी यांनी पेनटाकळी प्रकल्पाचे पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थेच्या महासंघाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यामुळे पेनटाकळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्याच वेळेस उर्वरित शेतकऱ्यांचे शेती सिंचन होईल, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.