शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांचा हल्लाबोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश ...

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत मेहकर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शनिवारी हल्लाबोल केला.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पावर मोठा कालवा असून, या कालव्याच्या माध्यमातून हजारो हेक्टरचे सिंचन केले जाते. यामध्ये शेतकरी गहू, हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमूग यांसह भाजीपाला पिकांना या कालव्याद्वारे सिंचन केले जाते. या कालव्याद्वारे रब्बी पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले होते; मात्र कालवा हा झाडेझुडपे व गवत याने वेढला असल्याने या कालव्याद्वारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवायचे असल्यास पाणी मोठ्या प्रमाणावर कालव्यात सोडावे लागते. तेव्हाच जेमतेम पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते; मात्र डिसेंबर महिन्यामध्ये सदर कालवा हा पेनटाकळी शिवारात कालव्याला भगदाड पडून कालवा फुटला होता. यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या कालव्याची दुरुस्ती करून पंधरा दिवसानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आले होते; मात्र या कालव्यात झाडेझुडपे व गवत असल्यामुळे हा कालवा परत फुटण्याची भीती वाटत असल्याने पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. मेहकर तालुक्यातील वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर आदी ठिकाणाहून शेकडो शेतकरी यांनी पेनटाकळी प्रकल्पाचे पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थेच्या महासंघाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यामुळे पेनटाकळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्याच वेळेस उर्वरित शेतकऱ्यांचे शेती सिंचन होईल, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.