शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांचा हल्लाबोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश ...

मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत मेहकर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शनिवारी हल्लाबोल केला.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पावर मोठा कालवा असून, या कालव्याच्या माध्यमातून हजारो हेक्टरचे सिंचन केले जाते. यामध्ये शेतकरी गहू, हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमूग यांसह भाजीपाला पिकांना या कालव्याद्वारे सिंचन केले जाते. या कालव्याद्वारे रब्बी पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले होते; मात्र कालवा हा झाडेझुडपे व गवत याने वेढला असल्याने या कालव्याद्वारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवायचे असल्यास पाणी मोठ्या प्रमाणावर कालव्यात सोडावे लागते. तेव्हाच जेमतेम पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते; मात्र डिसेंबर महिन्यामध्ये सदर कालवा हा पेनटाकळी शिवारात कालव्याला भगदाड पडून कालवा फुटला होता. यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या कालव्याची दुरुस्ती करून पंधरा दिवसानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आले होते; मात्र या कालव्यात झाडेझुडपे व गवत असल्यामुळे हा कालवा परत फुटण्याची भीती वाटत असल्याने पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. मेहकर तालुक्यातील वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर आदी ठिकाणाहून शेकडो शेतकरी यांनी पेनटाकळी प्रकल्पाचे पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थेच्या महासंघाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यामुळे पेनटाकळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्याच वेळेस उर्वरित शेतकऱ्यांचे शेती सिंचन होईल, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.