शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शेतकरी आत्महत्यांचे खापर फोडले घरगुती कलहावर!

By admin | Updated: March 30, 2017 02:36 IST

बुलडाणा जिल्हा प्रशासनाने तयार केला शेतकरी आत्महत्यांचा अहवाल

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २९- शेतकरी आत्महत्यांचे खापर घरगुती कलहावर फोडण्यात आले आहे. बहुतांश शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे कारण शेतकर्‍यांवरील कृषी कर्जाचा बोझ्या तथा सिंचन सुविधेचा अभाव दाखविण्यात आला नसून, या आत्महत्यांमागे कौटुंबिक कलह असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकरी आत्महत्यांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये आजपर्यंंत जिल्ह्यात २१३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी ९७८ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त ५६७ शेतकर्‍यांनी घरगुती कलहातून आत्महत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, गत दहा वर्षांंत लागोपाठ जिल्ह्याला दुष्काळाच्या छळा सोसाव्या लागल्या. सततची नापिकी व वाढणारे कर्ज यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मार्च २0१७ पर्यंंत जिल्ह्यातील नापिकीमुळे ३0१ आत्महत्या आणि ६७८ आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना मदत देण्यात आली. मात्र, शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा सध्याचा चिंतेचा विषय असला, तरी कर्जबाजारीपणा व्यतिरिक्त अपयश, अपमान, नैराश्य, कौटुंबिक कलह, व्यसनाधिनता आदी किरकोळ कारणेही आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या १९0 प्रकरणावर व्यसनाधिनता व ५६७ प्रकरणांवर घरगुती कलहचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.११४0 आत्महत्या प्रकरणं अपात्र मार्च २0१७ पर्यंंत जिल्ह्यात २१३८ शेतकर्‍यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. यापैकी केवळ ९७८ प्रकरणं पात्र ठरवून त्यांना शासनाकडून मदत प्राप्त झाली, तर ११४0 आत्महत्या प्रकरणं विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आली.तीन महिन्यांत ७७ आत्महत्यानोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च २0१७ या तीन महिन्याच्या काळात जिल्ह्यात ७७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. यात जानेवारीमध्ये ३१, फेब्रुवारीमध्ये ३१ आणि मार्चमध्ये १५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यात २१ प्रकरणांत मदत देण्यात आली असून, ३७ प्रकरणं अपात्र ठरविण्यात आली आहे,. तर १९ प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत.शेतकरी आत्महत्यांचा आलेख एकूण आत्महत्या    २१३८पात्र प्रकरण              ९७८अपात्र प्रकरण         ११४0प्रलंबित प्रकरण          २0आजारपणामुळे        २६0व्यसनाधिनता         १९0अपघात                    २१बेरोजगारी                ६६नैसर्गिक आपत्ती      ३९घरगुती भांडण         ५६७