शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच!

By admin | Updated: July 1, 2017 00:06 IST

बुलडाणा जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कर्जमाफीने दिलासा नाही!

नितीन निमकर्डे। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. ११ जूनला कर्जमाफीची पहिली घोषणा झाल्यापासून आतापर्यंत विदर्भ-मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात २२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नसल्याचे स्पष्ट होत आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर रविवार, ११ जून रोजी राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती; परंतु या कर्जमाफीचे निकष जाहीर केले नव्हते. दरम्यान, शनिवार, २४ जून रोजी सरसकट कर्जमाफीचे स्वरूप जाहीर करताना सरकारने दीड लाखांपर्यंतचे ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ केले; परंतु या कर्जमाफीचा लाभ मिळण्याकरिता सन २०१६-१७ मधील कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. याकरिता मुदतसुद्धा ३० जूनपर्यंतच असल्याने या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्हानिहाय आत्महत्येची आकडेवारी११ जूनला कर्जमाफी जाहीर झाल्यापासून विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण ११ जिल्ह्यांमधील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पुढीलप्रमाणे अकोला दोन, बुलडाणा चार, वाशिम दोन, गोंदिया दोन, भंडारा एक, यवतमाळ एक, नागपूर एक, हिंगोली तीन, परभणी चार, नांदेड एक, लातूर एक, अशा एकूण २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.कर्जमाफीच्या अटी ठरताहेत जाचकसन २०१२ पासून सलग तीन-चार वर्षे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या अटी जाचक ठरत आहेत. दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी उर्वरित कर्जाचा भरणा त्वरित करायला लावणे संयुक्तिक नाहीच. त्यातही अनेक शेतकऱ्यांचे सन २०१६ मधील पुनर्गठन झालेले कर्जच तेवढे माफ झालेले आहे. जे पाच टप्प्यात भरावयाचे होते व ज्याचा शेतकऱ्यांना फारसा ताण नव्हताच, ते माफ केले आणि चालू वर्षातील मोठे कर्ज ताबडतोब भरायला लावले जात असल्याने फसविले गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.