शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

By admin | Updated: April 24, 2017 02:53 IST

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नाफेड व एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून, तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला आहे. हमीभावाचे चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. तरीही विविध खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी खरेदी केंद्रावर असलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.नाफेडने जिल्ह्यातील शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा या खरेदी केंद्रावरून २२ एप्रिल अखेर २ लाख २६ हजार २०५ क्विंटल, तर एफसीआयच्यावतीने खामगाव, मलकापूर, लोणार, नांदुरा जळगाव जामोद या खरेदी केंद्रावरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तरीही खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यावर्षी शासनाने नाफेड एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून तुरीला ५०५० रुपये हमी भाव दिला आहे. हमी भाव चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, खरेदी केंद्रावर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे काही दिवसातच बारदाना संपून गेला होता. विविध पक्ष संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने बारदाना उपलब्ध करून दिला होता; परंतु तुरीची आवक पाहता शासनाने तूर खरेदीची मुदत ही २२ एप्रिलपर्यंत ठरवून दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नाफेडने सात खरेदी केंद्रांवरून २ लाख २६ हजार २०५ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तर एफसीआयने पाच खरेदी केंद्रांवरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ तुरीची खरेदी केली आहे. दरम्यान, नाफेडने ११४ कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी केली. त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एफसीआयने ११४ कोटी ६८ लाख ६० हजार ९५४ रुपयांची तूर खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ९४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक फटकानाफेड एफसीआयच्या खरेदी केंद्रावर जवळपास पावणे दोन लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर असलेली तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शासनाने २२ एप्रिल ही तूर खरेदीची मुदत दिली होती. त्यामुळे आजपर्यंत नाफेडने २ लाख २६ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटींचे चुकारे देण्यात आले आहेत. यानंतर शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.- पी.एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.