शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

By admin | Updated: April 24, 2017 02:53 IST

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नाफेड व एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून, तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला आहे. हमीभावाचे चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. तरीही विविध खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी खरेदी केंद्रावर असलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.नाफेडने जिल्ह्यातील शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा या खरेदी केंद्रावरून २२ एप्रिल अखेर २ लाख २६ हजार २०५ क्विंटल, तर एफसीआयच्यावतीने खामगाव, मलकापूर, लोणार, नांदुरा जळगाव जामोद या खरेदी केंद्रावरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तरीही खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यावर्षी शासनाने नाफेड एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून तुरीला ५०५० रुपये हमी भाव दिला आहे. हमी भाव चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, खरेदी केंद्रावर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे काही दिवसातच बारदाना संपून गेला होता. विविध पक्ष संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने बारदाना उपलब्ध करून दिला होता; परंतु तुरीची आवक पाहता शासनाने तूर खरेदीची मुदत ही २२ एप्रिलपर्यंत ठरवून दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नाफेडने सात खरेदी केंद्रांवरून २ लाख २६ हजार २०५ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तर एफसीआयने पाच खरेदी केंद्रांवरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ तुरीची खरेदी केली आहे. दरम्यान, नाफेडने ११४ कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी केली. त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एफसीआयने ११४ कोटी ६८ लाख ६० हजार ९५४ रुपयांची तूर खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ९४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक फटकानाफेड एफसीआयच्या खरेदी केंद्रावर जवळपास पावणे दोन लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर असलेली तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शासनाने २२ एप्रिल ही तूर खरेदीची मुदत दिली होती. त्यामुळे आजपर्यंत नाफेडने २ लाख २६ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटींचे चुकारे देण्यात आले आहेत. यानंतर शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.- पी.एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.