शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

By admin | Updated: April 24, 2017 02:53 IST

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नाफेड व एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून, तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला आहे. हमीभावाचे चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. तरीही विविध खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी खरेदी केंद्रावर असलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.नाफेडने जिल्ह्यातील शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा या खरेदी केंद्रावरून २२ एप्रिल अखेर २ लाख २६ हजार २०५ क्विंटल, तर एफसीआयच्यावतीने खामगाव, मलकापूर, लोणार, नांदुरा जळगाव जामोद या खरेदी केंद्रावरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तरीही खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यावर्षी शासनाने नाफेड एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून तुरीला ५०५० रुपये हमी भाव दिला आहे. हमी भाव चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, खरेदी केंद्रावर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे काही दिवसातच बारदाना संपून गेला होता. विविध पक्ष संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने बारदाना उपलब्ध करून दिला होता; परंतु तुरीची आवक पाहता शासनाने तूर खरेदीची मुदत ही २२ एप्रिलपर्यंत ठरवून दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नाफेडने सात खरेदी केंद्रांवरून २ लाख २६ हजार २०५ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तर एफसीआयने पाच खरेदी केंद्रांवरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ तुरीची खरेदी केली आहे. दरम्यान, नाफेडने ११४ कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी केली. त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एफसीआयने ११४ कोटी ६८ लाख ६० हजार ९५४ रुपयांची तूर खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ९४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक फटकानाफेड एफसीआयच्या खरेदी केंद्रावर जवळपास पावणे दोन लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर असलेली तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शासनाने २२ एप्रिल ही तूर खरेदीची मुदत दिली होती. त्यामुळे आजपर्यंत नाफेडने २ लाख २६ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटींचे चुकारे देण्यात आले आहेत. यानंतर शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.- पी.एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.