शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सोमवारपासून शेतकरी जागर यात्रा; वर्धा येथे होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:49 IST

बुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमातृतिर्थातून होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.यासंदर्भात भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल, शेतकरी जागर यात्रा संयोजक अँड. अमोल अंधारे, राजेश पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार भवनाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. २६ जानेवारीला वर्धा येथे या दोन्ही यात्रांचा समारोप होणार आहे. त्यानुषंगाने मातृतीर्थ येथून निघणार्‍या यात्रेचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते १५ जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल हे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून नारायण महाराज शिंदे, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चिखली अर्बनचे सतीश गुप्त, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सनद गुप्ता, शेतकरी यात्रा प्रमुख दिवाकर नेरकर, जिल्हा सेंद्रिय शेती कंपनीचे समाधान शिंगणे, उद्धव हिवराळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच गो संशोधक प्रा. हेमंत जांभेरकर उपस्थित राहतील. १५ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होईल. २,५५१ किमी प्रवास करून स्वदेशीचा मूलमंत्र देणारे महात्ता गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत या यात्रेचा समारोप होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा