शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सोमवारपासून शेतकरी जागर यात्रा; वर्धा येथे होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:49 IST

बुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमातृतिर्थातून होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.यासंदर्भात भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल, शेतकरी जागर यात्रा संयोजक अँड. अमोल अंधारे, राजेश पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार भवनाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. २६ जानेवारीला वर्धा येथे या दोन्ही यात्रांचा समारोप होणार आहे. त्यानुषंगाने मातृतीर्थ येथून निघणार्‍या यात्रेचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते १५ जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल हे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून नारायण महाराज शिंदे, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चिखली अर्बनचे सतीश गुप्त, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सनद गुप्ता, शेतकरी यात्रा प्रमुख दिवाकर नेरकर, जिल्हा सेंद्रिय शेती कंपनीचे समाधान शिंगणे, उद्धव हिवराळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच गो संशोधक प्रा. हेमंत जांभेरकर उपस्थित राहतील. १५ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होईल. २,५५१ किमी प्रवास करून स्वदेशीचा मूलमंत्र देणारे महात्ता गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत या यात्रेचा समारोप होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा