शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विषाची बाटली घेऊन शेतकऱ्याची वन कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारातील शेतकरी सध्या रोही आणि हरणांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पीक हे वन्यप्राणी नष्ट करीत आहे. ...

चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारातील शेतकरी सध्या रोही आणि हरणांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पीक हे वन्यप्राणी नष्ट करीत आहे. त्यातच अंचरवाडी येथील शेतकरी तथा उपसरपंच सुनील परिहार यांच्या मालकीच्या १० एकर शेतात असलेले पीक रोही या वन्यप्राण्यांनी नष्ट केले. या संदर्भात त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करूनही त्याचा पंचनामा वन विभागाने केला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने चक्क विषाची बाटली घेऊन बुलडाणा वनपरिक्षेत्र कार्यालय गाठत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा अनर्थ टाळला. सोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी या शेतकऱ्याची समजूत घालून त्याचे समाधान केले.

दुसरीकडे, या घटनेचे गांभीर्य पाहता बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी डुकरे, प्रभाकर लोखंडे यांनीही वेळीच या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यास रोखले. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी त्वरित शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वन कर्मचाऱ्यांना पंचनाम्याकामी त्वरित रवाना गेल्यामुळे हे प्रकरण थोडक्यात निवळले. या संदर्भात पोलीस प्रशासनाची त्यांच्या स्तरावरील कारवाई सुरू आहे.