शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

भाव मिळत नसल्याने टोमॅटोचा झाला ‘लाल चिखल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 10:54 IST

Agriculture News : भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  

- संतोष आगलावेलोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड :  कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या बघता शासनाने सुरू केलेले लॉकडाऊन तसेच आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने टोमॅटोसह भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. तसेच भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, बल्लाडी, वारखेड शिवारात दरवर्षी टोमॅटो, वांगी, मिरची आदी  भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. गत महिन्यापासून पुन्हा आठवडी बाजार बंद करण्यात आल्यामुळे भाजीपाल्याचा उठाव व ग्राहक नसल्यामुळे टोमॅटो, मिरची, वांगी शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. या भागात वर्षातून दोनदा टोमॅटो पीक घेणारे बरेच शेतकरी आहेत. प्रथम टोमॅटोची लागवड पावसाळ्यात जुलै महिन्यात करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात शेवटी काढणीस सुरुवात होते. त्यावेळेस सहाशे ते सातशे रुपयांच्या वर एका टोमॅटो कॅरेटला भाव मिळतो. शेतकरी दुसऱ्यांदा टोमॅटो पेरणी जानेवारी महिन्यात करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. परिणामी कोरोनाच्या संकटामुळे टोमॅटो प्रति शंभर रुपये कॅरेट या दराने सुद्धा व्यापारी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवितात. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाजीपाला पीक उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांनी व्याजाने व उसनवारीने आणल्यामुळे तो कसा फेडायचा तसेच मुला- मुलीचे लग्न, शिक्षण आजारपणासाठी पैसे कोठून आणायचे, या चिंतेत भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

एका एकराला ४० हजार रुपये खर्च  टोमॅटोचे एका एकरातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पीक निघण्याकरिता कमीत कमी एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो.   अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो गुरांना रस्त्यावर टाकून चारणे चालू केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

मी जानेवारी महिन्यात दोन एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. जेमतेम सत्तर हजार रुपये खर्च आला; मात्र आज रोजी टोमॅटोला योग्य भाव नसून खरेदीदार मिळत नसल्यामुळे टोमॅटो तोडणे बंद केले.  - गोपाल बोरसे.  टोमॅटो उत्पादक शेतकरी. दानापूर                                                                          

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगाव