शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

भाव मिळत नसल्याने टोमॅटोचा झाला ‘लाल चिखल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 10:54 IST

Agriculture News : भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  

- संतोष आगलावेलोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड :  कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या बघता शासनाने सुरू केलेले लॉकडाऊन तसेच आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने टोमॅटोसह भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. तसेच भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, बल्लाडी, वारखेड शिवारात दरवर्षी टोमॅटो, वांगी, मिरची आदी  भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. गत महिन्यापासून पुन्हा आठवडी बाजार बंद करण्यात आल्यामुळे भाजीपाल्याचा उठाव व ग्राहक नसल्यामुळे टोमॅटो, मिरची, वांगी शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. या भागात वर्षातून दोनदा टोमॅटो पीक घेणारे बरेच शेतकरी आहेत. प्रथम टोमॅटोची लागवड पावसाळ्यात जुलै महिन्यात करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात शेवटी काढणीस सुरुवात होते. त्यावेळेस सहाशे ते सातशे रुपयांच्या वर एका टोमॅटो कॅरेटला भाव मिळतो. शेतकरी दुसऱ्यांदा टोमॅटो पेरणी जानेवारी महिन्यात करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. परिणामी कोरोनाच्या संकटामुळे टोमॅटो प्रति शंभर रुपये कॅरेट या दराने सुद्धा व्यापारी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवितात. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाजीपाला पीक उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांनी व्याजाने व उसनवारीने आणल्यामुळे तो कसा फेडायचा तसेच मुला- मुलीचे लग्न, शिक्षण आजारपणासाठी पैसे कोठून आणायचे, या चिंतेत भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

एका एकराला ४० हजार रुपये खर्च  टोमॅटोचे एका एकरातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पीक निघण्याकरिता कमीत कमी एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो.   अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो गुरांना रस्त्यावर टाकून चारणे चालू केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

मी जानेवारी महिन्यात दोन एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. जेमतेम सत्तर हजार रुपये खर्च आला; मात्र आज रोजी टोमॅटोला योग्य भाव नसून खरेदीदार मिळत नसल्यामुळे टोमॅटो तोडणे बंद केले.  - गोपाल बोरसे.  टोमॅटो उत्पादक शेतकरी. दानापूर                                                                          

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगाव