शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळत नसल्याने टोमॅटोचा झाला ‘लाल चिखल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 10:54 IST

Agriculture News : भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  

- संतोष आगलावेलोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड :  कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या बघता शासनाने सुरू केलेले लॉकडाऊन तसेच आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने टोमॅटोसह भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. तसेच भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.  कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, बल्लाडी, वारखेड शिवारात दरवर्षी टोमॅटो, वांगी, मिरची आदी  भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. गत महिन्यापासून पुन्हा आठवडी बाजार बंद करण्यात आल्यामुळे भाजीपाल्याचा उठाव व ग्राहक नसल्यामुळे टोमॅटो, मिरची, वांगी शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. या भागात वर्षातून दोनदा टोमॅटो पीक घेणारे बरेच शेतकरी आहेत. प्रथम टोमॅटोची लागवड पावसाळ्यात जुलै महिन्यात करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात शेवटी काढणीस सुरुवात होते. त्यावेळेस सहाशे ते सातशे रुपयांच्या वर एका टोमॅटो कॅरेटला भाव मिळतो. शेतकरी दुसऱ्यांदा टोमॅटो पेरणी जानेवारी महिन्यात करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. परिणामी कोरोनाच्या संकटामुळे टोमॅटो प्रति शंभर रुपये कॅरेट या दराने सुद्धा व्यापारी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवितात. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाजीपाला पीक उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांनी व्याजाने व उसनवारीने आणल्यामुळे तो कसा फेडायचा तसेच मुला- मुलीचे लग्न, शिक्षण आजारपणासाठी पैसे कोठून आणायचे, या चिंतेत भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

एका एकराला ४० हजार रुपये खर्च  टोमॅटोचे एका एकरातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पीक निघण्याकरिता कमीत कमी एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो.   अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो गुरांना रस्त्यावर टाकून चारणे चालू केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

मी जानेवारी महिन्यात दोन एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. जेमतेम सत्तर हजार रुपये खर्च आला; मात्र आज रोजी टोमॅटोला योग्य भाव नसून खरेदीदार मिळत नसल्यामुळे टोमॅटो तोडणे बंद केले.  - गोपाल बोरसे.  टोमॅटो उत्पादक शेतकरी. दानापूर                                                                          

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगाव