शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

खोटे आश्वासन देणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:24 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पिपरटोला येथील कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असून भाजप सरकार खोटे आश्वासन देणारी सरकार असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र नेहमीच कॉँग्रेस पक्षाचे बळकट गड राहिले आहे. मात्र मागील काही काळात कॉँग्रेसचा गड तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते चुकीचा प्रचार करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. मात्र आता जनतेलाही भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखू आला आहे, त्याचे परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले असल्याचेही आमदार अग्रवाल सांगितले.मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, रूद्रसेन खांडेकर, विक्की बघेले, लक्ष्मी रहांगडाले, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मदन लिल्हारे, ओमप्रकाश रहांगडाले, डॉ. योगेश बिसेन, कृपाल लिल्हारे, प्रकाश तांडेकर, राजेश ठाकरे, संतोष ठाकरे, दिनेश तुरकर, अनिल चुलपार, लखन पटले, नलिनी शहारे, मधु हनवते यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस