शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्जमाफीच्या अर्जासाठी १ मेपर्यंत मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:39 IST

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो.

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर न करू शकलेल्यांना पुन्हा एकदा अर्जभरण्याची संधी दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार कर्जमफीचे अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून मोफत पुरविण्यातबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 एकरकमी कर्ज योजनेसाठी ३० जूनपर्यंत मुदत

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत अर्ज भरण्यासाठी १ मेची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकरकमी कर्ज असलेल्या शेतकºयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास ३० जुन २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना