शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्जमाफीच्या अर्जासाठी १ मेपर्यंत मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:39 IST

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो.

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर न करू शकलेल्यांना पुन्हा एकदा अर्जभरण्याची संधी दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार कर्जमफीचे अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून मोफत पुरविण्यातबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 एकरकमी कर्ज योजनेसाठी ३० जूनपर्यंत मुदत

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत अर्ज भरण्यासाठी १ मेची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकरकमी कर्ज असलेल्या शेतकºयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास ३० जुन २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना