शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अर्जासाठी १ मेपर्यंत मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:39 IST

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो.

बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर न करू शकलेल्यांना पुन्हा एकदा अर्जभरण्याची संधी दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे. अर्ज सादर करण्यास १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार कर्जमफीचे अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून मोफत पुरविण्यातबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत: सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतो. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 एकरकमी कर्ज योजनेसाठी ३० जूनपर्यंत मुदत

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत अर्ज भरण्यासाठी १ मेची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकरकमी कर्ज असलेल्या शेतकºयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास ३० जुन २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना