शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पश्चिम वऱ्हाडात रुजतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

बुलडाणा: भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला ...

बुलडाणा: भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे. पश्चिम वऱ्हाडातही हा विषमुक्त शेतीचा प्रयोग रुजत आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेण्यात येत आहे.

कमी काळात, कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर पिकांवर केला जात आहे. बाजारातही अशी अनेक रसायने उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा रसायनांच्या माध्यमातून भाजीपाला लागवड होत असल्याने, अनेकांना केमिकलपासून उत्पादित केलेल्या भाज्या सेवन केल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिणामी, बहुतांश ग्राहकांचा कल आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याकडे वाढला आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. जून ते जुलै या कालावधीमध्ये ही लागवड करण्यात आलेली आहे.

पश्चिम वऱ्हाडातील परसबागा

बुलडाणा: ९७८४

अकोला: ५२९४

वाशिम: ५०२२

वर्षभर खा विषमुक्त भाजीपाला

आपल्या परिवाराला बाराही महीने विषमुक्त ताजा भाजीपाला मिळावा, वेगवेगळ्या भाज्या नियमित आहारात मिळाव्यात, याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने माझी पोषण परसबाग मोहीम राबविली. त्यात बुलडाणा जिल्ह्याने दिलेले परसबागेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परसबागा या ग्रामीण भागात तयार करण्यात आल्या असून, त्याचा फायदा महिलांना वर्षभर होणार आहे. १२ ही महिने महिलांना त्यांच्या परिवाराला विषमुक्त, ताजा भाजीपाला आहारात देता येणार आहे.

स्वप्निल आराख, जिल्हा व्यवस्थापक, उमेद बुलडाणा.

राज्यभर राबविली ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम राज्यभर राबविण्यात आली. १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यात आल्या. या अभियानाला पश्चिम वऱ्हाडातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.