शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलदूत बनून प्रत्येकाने जलजागृती करावी - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:44 IST

पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्यावतीने १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्हाभरात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले.कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बुलडाणा : मानवी इतिहासात जलजागृती करावी लागणे ही दुख:द बाब आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्ष्य बघता पाण्याचे महत्त्व सर्वाेदीत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्हाभरात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, सिंचन मित्र मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे शेतीसाठी व एकत्रितच सर्व क्षेत्रासाठी पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. सिंचनाचे प्रमाणही राज्यात १८ टक्के आहे. पाण्याचा अमर्याद होत असलेल्या भूजल उपशामुळे भूजल पातळी कमालीची खलावत आहे. ही धोक्याची घंटा आहे. निसर्गाने निर्माण केलेले जलचक्र अबाधित ठेवून पुढील पिढ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याची बचत करायला पाहिजे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंवर्धनाची प्रभावी कार्यपद्धती अवलंबून काम करावे, असे ते म्हणाले. षण्मुखराजन एस. यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. सोबतच वॉटर रन स्पर्धा २० मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून चंद्रकांत साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorतहसीलदार