शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अर्धा पावसाळा उलटला तरीही धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST

धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे ...

धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे अद्यापही तहानलेल्या अवस्थेत आहेत. राज्यात मुसळधार होणाऱ्या पावसाची धाड शिवारात अत्यंत जेमतेमच उपस्थिती लावली आहे.

खरिपाच्या पिकांना आवश्यक असणारा पाऊस रिमझिम स्वरूपात मिळत असल्याने त्यांना जीवदान मिळत असले तरीही अगदी थोडक्या प्रमाणात होणारा पाऊस पिकांवरील विविध किडींच्या प्रादुर्भावाकरिता पोषक ठरत आहे. सोबत सातत्याने रिमझिम पावसाने घाणीचे साम्राज्य वाढीस लागून गावागावातून साथ आजाराचे प्रस्थ वाढले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आजारी रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन यंदा उत्पादन क्षमता वाढण्याची लक्षणे दिसून येत असली तरी आगामी काळात रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या साधारण दोन महिन्यांत तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे उर्वरित दोन महिन्यांत पाऊस सक्रिय स्थितीत राहून तो भरमसाट प्रमाणात होईल का? याची शाश्वती दिसत नसल्यामुळे शेतीसह संबंधित घटक हवालदिल आहे. तालुक्यातील धाड भागात असलेल्या करडी, मासरुळ, शेकापूर, बोदेगाव, ढालसावंगी या पाचही प्रकल्पात सध्या जेमतेमच पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. जर पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना सबंध तालुक्याला करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.

मागील वर्षी या वेळेला सर्वत्र धरणे ओसंडून वाहत होती, तर प्रमाणाबाहेर पाऊस झाल्याने शेतीचे बहुतांश नुकसान याठिकाणी झाले होते. यंदाच्या वर्षी अर्धा पावसाळा उलटला तरीही मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामाची शाश्वती सध्यातरी देता येत नाही. तसेच भागातील धरणांवर आधारित अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगदी सुरुवातीपासूनच रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी खरिपाच्या पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढते राहिले आहे. तथा गवतवर्गीय तणांची वाढ भरमसाट झाल्याने या घटकांचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांना रासायनिक औषधी यांचा वापर जास्त प्रमाणात करून, खरिपाच्या पिकांना वाचण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्तीचा खर्च हा तणांच्या नियंत्रणासाठी आणि पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागत आहे. यामुळे यावर्षी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, आणि खरिपाची पिके हाती किती प्रमाणात येतात हे आता ठरवणे शक्य नाही. एकूणच यावर्षी शेती उत्पादन जेमतेमच राहण्याची शक्यता जास्त आहे.

-प्रमोद वाघुर्डे, धाड, शेतकरी.