शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अर्धा पावसाळा उलटला तरीही धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST

धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे ...

धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे अद्यापही तहानलेल्या अवस्थेत आहेत. राज्यात मुसळधार होणाऱ्या पावसाची धाड शिवारात अत्यंत जेमतेमच उपस्थिती लावली आहे.

खरिपाच्या पिकांना आवश्यक असणारा पाऊस रिमझिम स्वरूपात मिळत असल्याने त्यांना जीवदान मिळत असले तरीही अगदी थोडक्या प्रमाणात होणारा पाऊस पिकांवरील विविध किडींच्या प्रादुर्भावाकरिता पोषक ठरत आहे. सोबत सातत्याने रिमझिम पावसाने घाणीचे साम्राज्य वाढीस लागून गावागावातून साथ आजाराचे प्रस्थ वाढले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आजारी रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन यंदा उत्पादन क्षमता वाढण्याची लक्षणे दिसून येत असली तरी आगामी काळात रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या साधारण दोन महिन्यांत तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे उर्वरित दोन महिन्यांत पाऊस सक्रिय स्थितीत राहून तो भरमसाट प्रमाणात होईल का? याची शाश्वती दिसत नसल्यामुळे शेतीसह संबंधित घटक हवालदिल आहे. तालुक्यातील धाड भागात असलेल्या करडी, मासरुळ, शेकापूर, बोदेगाव, ढालसावंगी या पाचही प्रकल्पात सध्या जेमतेमच पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. जर पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना सबंध तालुक्याला करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.

मागील वर्षी या वेळेला सर्वत्र धरणे ओसंडून वाहत होती, तर प्रमाणाबाहेर पाऊस झाल्याने शेतीचे बहुतांश नुकसान याठिकाणी झाले होते. यंदाच्या वर्षी अर्धा पावसाळा उलटला तरीही मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामाची शाश्वती सध्यातरी देता येत नाही. तसेच भागातील धरणांवर आधारित अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगदी सुरुवातीपासूनच रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी खरिपाच्या पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढते राहिले आहे. तथा गवतवर्गीय तणांची वाढ भरमसाट झाल्याने या घटकांचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांना रासायनिक औषधी यांचा वापर जास्त प्रमाणात करून, खरिपाच्या पिकांना वाचण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्तीचा खर्च हा तणांच्या नियंत्रणासाठी आणि पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागत आहे. यामुळे यावर्षी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, आणि खरिपाची पिके हाती किती प्रमाणात येतात हे आता ठरवणे शक्य नाही. एकूणच यावर्षी शेती उत्पादन जेमतेमच राहण्याची शक्यता जास्त आहे.

-प्रमोद वाघुर्डे, धाड, शेतकरी.