शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जिल्ह्यात आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: March 11, 2015 01:53 IST

शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ.

बुलडाणा : शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना जास्तीतजास्त उत्पन्न मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात उत्पादक कंपनी स्थापन केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत तसेच नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यात २0 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येणार असून, यापैकी आठ कंपन्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे मालक झाले असून, त्यांचे जीवनमान आणि आर्थिकस्तर उंचावण्यास मोलाची मदत होणार आहे.ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती देऊन अशा कंपन्यांची स्थापना ही शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यात स्थापन होऊ घातलेल्या शेतकरी कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित दहा कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या कंपन्यांना बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मदत करीत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी कापूस, डाळ, केळी, दूध अशा विविध शेतमालावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचेही काम करणार आहेत. शिवाय या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही निर्यात करण्यावर प्राधान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये शेतकरी कंपनीसाठी शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत, त्यासाठी या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एमएएसपी प्रकल्पातून अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित भागभांडवल शेतकर्‍यांना उभे करायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेमुळे जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ झाले आहे.