शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: March 11, 2015 01:53 IST

शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ.

बुलडाणा : शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना जास्तीतजास्त उत्पन्न मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात उत्पादक कंपनी स्थापन केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत तसेच नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यात २0 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येणार असून, यापैकी आठ कंपन्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे मालक झाले असून, त्यांचे जीवनमान आणि आर्थिकस्तर उंचावण्यास मोलाची मदत होणार आहे.ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती देऊन अशा कंपन्यांची स्थापना ही शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यात स्थापन होऊ घातलेल्या शेतकरी कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित दहा कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या कंपन्यांना बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मदत करीत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी कापूस, डाळ, केळी, दूध अशा विविध शेतमालावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचेही काम करणार आहेत. शिवाय या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही निर्यात करण्यावर प्राधान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये शेतकरी कंपनीसाठी शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत, त्यासाठी या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एमएएसपी प्रकल्पातून अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित भागभांडवल शेतकर्‍यांना उभे करायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेमुळे जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ झाले आहे.