शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेती मूल्यवर्धित आयोग स्थापन करा

By admin | Updated: January 19, 2015 02:17 IST

बुलडाणा येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात झाल्या नऊ गटचर्चा.

बुलडाणा : शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे शेतीसाठी शासनाने शेती मूल्यवर्धित आयोग उभा करावा व दर पाच वर्षांनी आयोगाने चर्चा करून शेतमालाचे भाव ठरवावेत. याशिवाय शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी स्वत: आंदोलन उभे करावे. त्याशिवाय शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार नाहीत, असा सूर रविवारी रंगलेल्या 'शेतकरी आत्महत्या, नव्हे कर्जबळी' या गटचर्चेतून निघाला.तेराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात एकूण नऊ विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. बहुतांश चर्चेमध्ये आदिवासी, महिला, विद्यार्थी व तरुणांनी सहभाग घेतला. 'मनुस्मृती दहन दिन : भारतीय स्त्रीमुक्ती दिन' या विषयावर दीपाली तेंडुलकर यांनी चर्चा केली. आदिवासी स्त्रिया बहुपत्नीत्व, संपत्तीत महिलांचा वाटा, घटस्फोट या विषयांवर आजही संघर्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 'जल, जंगल आणि जमीन' या विषयावरील गटचेर्चेत प्रा. श्याम मुडे यांनी विस्ताराने मांडणी करताना शेतकरी पॅकेज हे तकलादू व शेतकर्‍यांची थट्टा करणारे असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर शंका घेणार्‍या तमाम लेखणी कसाई कुबेरांचा यावेळी निषेध करण्यात आला. 'शिक्षणातील ब्राह्मणीकरण जागतिकीकरण आणि मनुवादाचे नूतनीकरण' या विषयावर दिलीप गावित यांनी सद्य:स्थिती मांडली. 'भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची वाट' या चर्चेत ज्वाला मोरे यांनी भूमिका मांडली. 'महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षण दिन' यावरील चर्चेत विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेतला. याशिवाय 'वाढते सामाजिक अत्याचार आणि समतेचे प्रश्न', 'वाड्मयीन नियतकालिके आव्हाने', 'बहुजनांचे कलाभान काल आणि जागतिकीकरण, खाजगीकरण उदारीकरण', 'जात पंचायत आणि जातिअंताचा प्रश्न' या विषयांवर गटचर्चा चांगलीच रंगल्या. संचालन रमेश आराख यांनी केले.