शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

शेती मूल्यवर्धित आयोग स्थापन करा

By admin | Updated: January 19, 2015 02:17 IST

बुलडाणा येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात झाल्या नऊ गटचर्चा.

बुलडाणा : शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे शेतीसाठी शासनाने शेती मूल्यवर्धित आयोग उभा करावा व दर पाच वर्षांनी आयोगाने चर्चा करून शेतमालाचे भाव ठरवावेत. याशिवाय शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी स्वत: आंदोलन उभे करावे. त्याशिवाय शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार नाहीत, असा सूर रविवारी रंगलेल्या 'शेतकरी आत्महत्या, नव्हे कर्जबळी' या गटचर्चेतून निघाला.तेराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात एकूण नऊ विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. बहुतांश चर्चेमध्ये आदिवासी, महिला, विद्यार्थी व तरुणांनी सहभाग घेतला. 'मनुस्मृती दहन दिन : भारतीय स्त्रीमुक्ती दिन' या विषयावर दीपाली तेंडुलकर यांनी चर्चा केली. आदिवासी स्त्रिया बहुपत्नीत्व, संपत्तीत महिलांचा वाटा, घटस्फोट या विषयांवर आजही संघर्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 'जल, जंगल आणि जमीन' या विषयावरील गटचेर्चेत प्रा. श्याम मुडे यांनी विस्ताराने मांडणी करताना शेतकरी पॅकेज हे तकलादू व शेतकर्‍यांची थट्टा करणारे असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर शंका घेणार्‍या तमाम लेखणी कसाई कुबेरांचा यावेळी निषेध करण्यात आला. 'शिक्षणातील ब्राह्मणीकरण जागतिकीकरण आणि मनुवादाचे नूतनीकरण' या विषयावर दिलीप गावित यांनी सद्य:स्थिती मांडली. 'भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची वाट' या चर्चेत ज्वाला मोरे यांनी भूमिका मांडली. 'महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षण दिन' यावरील चर्चेत विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेतला. याशिवाय 'वाढते सामाजिक अत्याचार आणि समतेचे प्रश्न', 'वाड्मयीन नियतकालिके आव्हाने', 'बहुजनांचे कलाभान काल आणि जागतिकीकरण, खाजगीकरण उदारीकरण', 'जात पंचायत आणि जातिअंताचा प्रश्न' या विषयांवर गटचर्चा चांगलीच रंगल्या. संचालन रमेश आराख यांनी केले.