शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जल व भूमी संधारण अभियानाला बळकटी

By admin | Updated: April 10, 2015 23:34 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ७४ लाखांची तरतूद; ५२ गावांमध्ये कामे सुरू.

नाना हिवराळे /खामगाव (जि. बुलडाणा) : महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये ८४ ठिकाणी माती नालाबांध व सिमेंट नालाबांध तुटफूट दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामासाठी जिल्ह्याला ७४ लाखांची तरतूद झाली असून, अभियानामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बळकटीकरणास मदत होत आहे. राज्यातील शेतीची अवस्था कधी नव्हे इतकी बिकट झाली आहे. शेतीसाठी हवामान, पतपुरवठा तसेच बाजार यापैकी कोणतीच गोष्ट म्हणावी तशी अनुकूल नाही. या सर्व घटकांमध्ये हवामान व विशेषत: लहरी पाऊस अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावत असतो. आपल्याकडील बहुतांश जमीन ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊसही बेभरवशाचा झाल्याने याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर दिसून आला आहे. मोठय़ा प्रमाणावर कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी सिंचनक्षेत्र वाढविण्यास मदत व्हावी, याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान शासनाच्यावतीने राबविणे सुरू आहे. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन उपलब्धता वाढविणे, पडीक जमिनीचा विकास व रोजगार उपलब्धता वाढविणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर झाल्याने गंभीर पाणीटंचाईवर मात करणे ही अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. सन २0१४-१५ करिता जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ८४ ठिकाणी माती नाला बांध व सिमेंट नाला बांध तुटफूट दुरुस्तीच्या कामासाठी ७४ लाख २५ हजार २८५ रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.