राजू पठाण / सुलतानपूर (बुलडाणा)सुलतानपूर वीज वितरण केंद्रामध्ये कर्मचार्यांच्या रिक्त पदांची समस्या कायम आहे. केंद्रांतर्गत २५ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यातील १९ गावांचा कार्यभार केवळ ५ कर्मचारी सांभाळत आहेत, तर ६ गावे वार्यावर असल्याचे चित्र आहे.या २५ गावांमध्ये एकूण ६११५ वीज ग्राहक असून, त्यात ४२६४ घरगुती ग्राहक, १३0 वाणिज्य ग्राहक, ६0 औद्योगिक ग्राहक, १६२५ कृषी ग्राहक, १0 पाणीपुरवठा ग्राहक आणि २६ सार्वजनिक दिवाबत्ती ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांना सुलतानपूर ३३ केव्ही उपकेंद्रांतून ११ केव्ही चिंचोली गावठाण फिडर लांबी ३८ किमी व कृषी फिडर लांबी ५६ किमी राजेगाव गावठाण फिडर लांबी ३४ किमी, कृषी फिडर लांबी ३७ किलो मीटर, वेणी गावठाण फिडर लांबी ४२ किमी, कृषी फिडर लांबी ३७ किमी तसेच २0१२ दरम्यान भारीत झालेले धरण कृषी फिडर लांबी ४0 किमी विस्तारीत झालेली सदर लाईन जुनी आहे. पाऊस व वारा आला तरी लाईनच्या तारा तुटून लाईनवर लगेच ब्रेक डाऊन होतो आणि नंतर लाईन स्टाफचा बराच वेळ ब्रेकडाऊन काढण्यात जातो. या केंद्रामध्ये एकूण ४ एएलएम, २ लाईनमन, २ लाईन हेल्पर, ३ वीज सहायक आहेत, असे असले तरी कंपनीच्या नियमाप्रमाणे वीज सहायकाला पोलवर चढून काम करण्याचा अधिकार नाही तर लाईन हेल्परला ११ केव्ही फिडरवर काम करण्याचा अधिकार नाही. असे असताना सुलतानपूर वीज वितरण केंद्रातील एकेका लाईन स्टाफला चारचार गावे दिलेली असून, केंद्रांतर्गत ६ गावे आजही वार्यावर आहेत. या केंद्रातील ४ लाईनमन सेवानवृत्त झाले आहेत. तर २ लाईनमनच्या बदल्या करण्यात आल्या असताना अद्याप त्या रिक्त जागांवर दुसरे कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्या जागा रिक्तच आहेत.
वीज केंद्रावर कर्मचा-यांची वानवा
By admin | Updated: December 25, 2014 23:47 IST