शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्र मागितल्याने कर्मचा-यांमध्ये धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:45 IST

न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.

ठळक मुद्देआरक्षित जागेवरील पदोन्नती रद्दच्या निर्णयानंतर शासनाने मागितले प्रमाणपत्रकर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न 

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.शासनाच्यावतीने विविध विभागातील अनेक कर्मचाºयांना नोकरीमध्ये जातीनिहाय आरक्षणानुसार पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्यावर आक्षेप घेत नोकरीमध्ये पदोन्नती देत असताना आरक्षण लागू करू नये, असा निर्णय नॅकने दिला. सदर निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवताच सरकारला तीन महिन्यांचा कालावधीही दिला आहे. न्यायालयानेच या निर्णयाला तीन महिन्यांचा स्थगनादेश दिला. त्यामुळे आरक्षित जागेवर कुणाला पदोन्नती दिली, राज्यात अशा कर्मचारी, अधिकाºयांची संख्या किती याची माहिती शासनाच्यावतीने गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी- अधिकारी, शिक्षक यासह  विविध विभागातील कर्मचारी व अधिकाºयांना प्रथम नियुक्ती आदेश व जात वैधता प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र गोळा करण्यात कर्मचारी मग्न आहेत. राज्यात आरक्षित कोट्यातून पदोन्नती मिळविणाºया कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करते की न्यायालयाचा आदेश मान्य करून पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांना पुन्हा पूर्वीच्या पदावर पाठविते, याबाबत कर्मचाºयांमध्ये उत्सूकता आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रे गोळा करण्यात कर्मचारी व्यस्त झाले आहेत.

अधिका-यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर काम करण्याची भीतीन्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाच्यावतीने यादी मागविण्यात आली आहे. न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिला आहे. आता शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यास अनेकांची पदोन्नती रद्द होणार असून, त्यांना पूर्वीच्या जागी काम करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे.

तीन महिने पदोन्नती सुरूच राहणारन्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे यादरम्यान आरक्षित कोट्यातून पदोन्नती न थांबविता शासनाने तीन महिने सदर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षित कोट्यातून पदोन्नतीचे प्रस्ताव स्थगित न करता त्याला मान्यता देण्यात येणार आहे.