शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जात वैधता प्रमाणपत्र मागितल्याने कर्मचा-यांमध्ये धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:45 IST

न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.

ठळक मुद्देआरक्षित जागेवरील पदोन्नती रद्दच्या निर्णयानंतर शासनाने मागितले प्रमाणपत्रकर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न 

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.शासनाच्यावतीने विविध विभागातील अनेक कर्मचाºयांना नोकरीमध्ये जातीनिहाय आरक्षणानुसार पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्यावर आक्षेप घेत नोकरीमध्ये पदोन्नती देत असताना आरक्षण लागू करू नये, असा निर्णय नॅकने दिला. सदर निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवताच सरकारला तीन महिन्यांचा कालावधीही दिला आहे. न्यायालयानेच या निर्णयाला तीन महिन्यांचा स्थगनादेश दिला. त्यामुळे आरक्षित जागेवर कुणाला पदोन्नती दिली, राज्यात अशा कर्मचारी, अधिकाºयांची संख्या किती याची माहिती शासनाच्यावतीने गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी- अधिकारी, शिक्षक यासह  विविध विभागातील कर्मचारी व अधिकाºयांना प्रथम नियुक्ती आदेश व जात वैधता प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र गोळा करण्यात कर्मचारी मग्न आहेत. राज्यात आरक्षित कोट्यातून पदोन्नती मिळविणाºया कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करते की न्यायालयाचा आदेश मान्य करून पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांना पुन्हा पूर्वीच्या पदावर पाठविते, याबाबत कर्मचाºयांमध्ये उत्सूकता आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रे गोळा करण्यात कर्मचारी व्यस्त झाले आहेत.

अधिका-यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर काम करण्याची भीतीन्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाच्यावतीने यादी मागविण्यात आली आहे. न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिला आहे. आता शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यास अनेकांची पदोन्नती रद्द होणार असून, त्यांना पूर्वीच्या जागी काम करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे.

तीन महिने पदोन्नती सुरूच राहणारन्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे यादरम्यान आरक्षित कोट्यातून पदोन्नती न थांबविता शासनाने तीन महिने सदर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षित कोट्यातून पदोन्नतीचे प्रस्ताव स्थगित न करता त्याला मान्यता देण्यात येणार आहे.